पुणे- "कोरोनाचा सामना करण्यासाठी ७२ हजार आशा कर्मचारी आणि ४ हजार गट प्रवर्तक खेडोपाडी जाऊन माहिती घेत आहेत. गाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातील दुवा बनल्या आहेत. मात्र त्यांना मास्कसारख्या सुविधाही नाहीत. त्याना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा नाही" असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी म्हटलं आहे.
"आशा सेविकांच्या प्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे" अशीही मागणी त्यांनी केली आहे.
कॉ.रेड्डी यांनी एक पत्रक काढून ही मागणी केली आहे. हे पत्रक मुख्यमंत्री ठाकरे यांना उद्देशून लिहिले आहे. " आपण महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्यासाठी चांगले कार्य करत आहात. आमचे सर्व सहकार्य आपल्याला आहे.कोरोनाचा सामना करण्यासाठी महराष्टात ७२ हजार आशा कर्मचारी (ASHA मान्यताप्राप्त आरोग्य कर्मचारी) व ४ हजार गट प्रवर्तक खेडोपाडी जाऊन माहिती गोळा करत आहेत. सरकारला देत आहेत. गाव व प्राथमिक आरोग्य केंद्र मधील हा दुवा आहे. त्यांना साध्या मास्कसारख्या प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यांना सरकारी कर्मचारी म्हणूनही दर्जा नाही. पगारही तुटपुंजा आहे. कोरोना विरोधी लढाईत त्यांचे बळ वाढवण्याठी त्यांच्या प्रश्नात आपण लक्ष घालावे व त्यांना मानसिक बळ द्यावे."असे रेड्डी यांनी या पत्रकात म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.