सर्वसमावेशक धोरण नसेल तर भाजपला आणखी पराभवाला सामोर जावं लागेल : प्रकाश मेहता 

सर्वसमावेशक धोरण नसेल तर भाजपला आणखी पराभवाला सामोर जावं लागेल : प्रकाश मेहता 

मुंबई : भाजपचे माजी आमदार अनिल गोटे काही वेळातच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित होणार आहे.

एकीकडे गोटे यांनी पक्ष सोडला आहे तर दुसरीकडे भाजपचे एक ज्येष्ठ नेते प्रकाश मेहता यांनी पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. पक्षात सर्वसमावेशक धोरण नसेल तर भाजपला आणखी पराभवाला सामोर जावं लागेल.असे म्हटले आहे. 

धुळ्यातील भाजपचे माजी आमदार असलेले अनिल गोटे शेकडो कार्यकर्त्यांसह करणार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. गोटे उत्तर महाराष्ट्रातील एक वजनदार नेते आहेत. मात्र महापालिका निवडणुकीपासून त्यांचे आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. नाराजीमुळे त्यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. 
गोटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका करतात. भाजपचे आणखी एक नेते एकनाथ खडसे हे ही नाराज आहेत. 

दरम्यान, प्रकाश मेहता यांनी भाजपला घरचा आहेर देताना म्हटले आहे, की भाजप महाराष्ट्रमध्ये सर्वसमावेशक धोरण असायला हवे. सर्वसमावेशक धोरण नसेल तर भाजपला आणखी पराभवाला सामोर जावं लागेल. भाजपाने नेतृत्वाने दखल घ्यायला हवी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com