शिवसेनेचा पोपट करण्यासाठी भाजप महाराष्ट्राचे तीन तुकडे करणार -  प्रकाश आंबेडकर

राज्यात सरकार स्थापन होण्यास लागत असलेला विलंब ही विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे. गतवेळच्या बरोबरीनेच संख्या बळ असताना भाजपने सत्ता स्थापन केली नाही. येथेच माशी शिंकली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडत त्रिभाजनाचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेचा पोपट होण्याची शक्यता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाशआंबेडकर यांनी व्यक्त केली.
शिवसेनेचा पोपट करण्यासाठी भाजप महाराष्ट्राचे तीन तुकडे करणार -  प्रकाश आंबेडकर

अकोला - राज्यात सरकार स्थापन होण्यास लागत असलेला विलंब ही विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे. गतवेळच्या बरोबरीनेच संख्या बळ असताना भाजपने सत्ता स्थापन केली नाही. येथेच माशी शिंकली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडत त्रिभाजनाचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेचा पोपट होण्याची शक्यता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश  आंबेडकर यांनी व्यक्त केली.

अकोला येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खळबळजनक खुलासा करीत महाराष्ट्राच्या त्रिभाजनाची तयारी सुरू असल्याचे सांगितले. मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करताना विरोध होणार आहे. त्यामुळे हा विरोध कमी करण्याच्या उद्देशाने वेगळ्या विदर्भ राज्याची घोषणा केली जाणार आहे. उर्वरित महाराष्ट्राचे एक राज्य असेल. सरदार पटेल यांनी १९५४ मध्ये स्थापन केलेल्या समितीनंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. भाषिक राज्यात मुंबईसह महाराष्ट्राला निजामाच्या ताब्यातील मराठवाडा आणि मध्ये प्रदेशातील विदर्भ जोडला गेला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रिपब्लिकन, मार्कसवादी, कम्युनिस्टानींही सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यावेळी मुंबईला महारष्ट्रापासून तोडण्याचे जे काम राहून गेले होते, ते आता केले जात आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र हवा की, मुंबई केंद्राशासित प्रदेश हवा याबाबत सर्व पक्षांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, अशी आग्रही भूमिका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. या पत्रकार परिषदेला वंचितचे जिल्ह्याध्यक्ष प्रमोद देंडवे आणि प्रदीप वानखडे, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची उपस्थित होती.

शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसने जाहीर करावा!
शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका काँग्रेसने जाहीर करावी. तीन पक्षांचे सरकार स्थापन होत आहे. त्यात काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. या पक्षाच्या वर्किंग कमिटीमध्ये शिवसेनेसोबत जाण्यावर चर्चा झाली नाही. पक्षाच्या कोणत्याच अधिकृत प्रवक्त्यांनी तसे जाहीर केले नाही. महाराष्ट्र प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांचीही प्रतिक्रिया नाही. साधकबाधक चर्चा नेत्यांसोबत झाल्यानंतर सरकारमध्ये सहभागी होण्याची अधिकृत घोषणा दिल्लीतील नेत्यांनी केली नाही. त्यामुळे काँग्रेसने आधी शिवसेनेसोबत जात असल्याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी बिनबुडाचा पक्ष
तीन पक्षांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बिनबुडाचा आहे. कधी भाजपकडे तर कधी शिवसेनेकडे हा पक्षा जातो. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका केवळ काँग्रेसने जाहीर करण्याची आमची मागणी असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com