जिल्हा बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय चुकिचा : एकनाथराव खडसे

...
eknath khadase
eknath khadase

जळगा : राज्यातील जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूका दुष्काळ तसेच युध्दजन्य परिस्थितीतच पुढे ढकलता येतात. मात्र आता तसे कोणतेही कारण नसतांना शासनाने तीन पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय चुकिचा आहे, असे मत माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले.

जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले कि राज्यातील 22 जिल्हा सहकारी बॅंकाच्या संचालक मंडळाच्या निवडणुका तीन महिने शासनाने पुढे ढकलल्या आहेत. शासनाचा हा निर्णय अत्यंत चुकिचा आहे. शासनला हा अधिकारच नाही. सहकार संस्थाच्या निवडणुकांसाठी राज्य सहकारी प्राधिकरणाचा स्वतंत्र विभाग आहे. त्यांच्यामार्फतच निवडणुका घेण्यात येत आहे .निवडणुका घेण्याचे तसेच पुढे ढकलण्याचे अधिकारही त्यांना आहेत.

शासनाला या निवडणुका पुढे ढकलायच्या असल्यास दुष्काळ तसेच युद्धजन्य परिस्थितीत त्यांना पुढे ढकलता येतात. परंतु आता सद्या तशी कोणतीही परिस्थिती नाही. केवळ कर्जमुक्तीसाठी प्रशासनाचे कर्मचारी कामात असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण होवू शकत नाही. कारण प्रशासना कसे हाताळावे हे शासनानेच ठरवायचे असते तो शासनाचा प्रश्‍न असतो. त्याचा निवडणुकीशी कोणताही संबध येत नाही, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com