खातेवाटप जाहीर करण्यास राहू कालामुळे विलंब?

.
खातेवाटप जाहीर करण्यास राहू कालामुळे विलंब?

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाचा शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यास उशीर का झाला? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विविध  पक्षातील अनेक राजकीय नेते ज्योतिष्यकारांचा सल्ला घेत असतात. त्याचप्रमाणे मुहूर्त आणि चांगला काळ यावरही अनेकांची महत्त्वाच्या कामांची सुरवात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या नेत्रदीपक सोहळ्यात गुरुवारी सायंकाळी शपथविधी झाला. खाते वाटपाबाबत रात्री उशिरा अंतिम निर्णय झाल्याचे समजते. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी खातेवाटप जाहीर होईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्ष खातेवाटप जाहीर झाले ते दुपारी पाऊणच्या सुमारास.

याबाबत एक तर्क असा लावला जात आहे की, पंचांगानुसार आज शुक्रवारी सकाळी 10 वाजून 36 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत दिल्लीत राहू काळ होता.  राहू कालामध्ये कोणतेही शुभ काम करू नये अशी अंधश्रद्धा विशेषतः उत्तर व दक्षिण भारतात आहे. 

आजारपणाशी झुंज देणारे अरुण जेटली यांनी तर एकदा पत्रकारांना त्यांच्याकडील दुर्मिळ घड्याळ दाखविले होते. ज्यात राहू काल सुरू झाला की त्या घड्याळाचा रंगच राखाडी-काळा होत असे! भाजप वर्तुळात या राहू कालाची समजूत जोरदार असल्याने आजही तो संपल्यावरच खातेवाटप जाहीर होणार अशी अटकळ खरी ठरली.  



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com