पोलिसांनी नितेश राणे यांना दरोडेखोराप्रमाणे वागणूक दिली: सतीश सावंत  

महामार्गाच्या आंदोलनानंतर अटक करण्यात आलेल्या स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि आमदार राणे यांना दरोडेखोराप्रमाणे पोलिसांनी वागणूक दिली आहे. हे आंदोलन जनतेसाठी होते; मात्र आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना सुडबुद्धीने वेगवेगळ्या पोलिस कोठडीत ठेवले. जसे काय यांनी खून आणि दरोडे टाकले आहेत, असा आरोप जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
पोलिसांनी नितेश राणे यांना दरोडेखोराप्रमाणे वागणूक दिली: सतीश सावंत  

कणकवली :   महामार्गाच्या आंदोलनानंतर अटक करण्यात आलेल्या स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि आमदार राणे यांना दरोडेखोराप्रमाणे पोलिसांनी वागणूक दिली आहे. हे आंदोलन जनतेसाठी होते; मात्र आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना सुडबुद्धीने वेगवेगळ्या पोलिस कोठडीत ठेवले. जसे काय यांनी खून आणि दरोडे टाकले आहेत, असा आरोप  जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. 

सावंत म्हणाले,  ''राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली; परंतु, परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांना आंदोलन करावे लागले. हा उद्रेक ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेबाबत होता. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आणि वाहनचालकांच्या मृत्यूबाबत उपकार्यकारी अभियंता, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा.'' 

सावंत पुढे म्हणाले, "स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले; मात्र जनतेला त्रास होवू नये म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने जनआंदोलन करताना उद्रेक झाला. यामुळे महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर जमावातून चिखलफेक झाली. त्यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर दोन तासांत दखल घेतली गेली; मात्र आमदार राणे यांनी प्रशासनावर गुन्हा दाखल करावा याबाबत दिलेल्या फिर्यादीवर कोणताही निर्णय झाला नाही. आमच्यावरील संस्कार हे कोणत्याही अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आहे. सकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कारही केला आहे; शेडेकर यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि त्यांनी केलेल्या दिशाभूलीमुळे हा प्रकार घडला. अॅड. उमेश सावंत यांच्या निवासस्थानालगतच्या मोरीमुळे पाणी साचून 83 लाखांचे नुकसान झाले याला जबाबदार कोण? हे नुकसान पालकमंत्र्यांनी भरून द्यावे.''

पक्षातर्फे आयोजित केलेल्या महामार्गावरील धावण्याच्या बक्षिसपात्र स्पर्धेला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तालुकाध्यक्षांना नोटीस बजावल्याने ही स्पर्धा रद्द करावी लागली, अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com