आंबेडकरांच्या एल्गार मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली 

आंबेडकरांच्या एल्गार मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली 

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी मुंबईत निघणाऱ्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आझाद मैदानात पक्षातर्फे एल्गार सभा घेण्यात येणार आहे. दरम्यान, मोर्चाला परवानगी नाकारून सरकारने लोकशाहीचा गळा दाबला असल्याची टीका पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. 

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाल्यानंतर भिडे यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी ऍड. आंबेडकर यांनी केली होती. या मागणीसाठी पक्षातर्फे सोमवारी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत एल्गार मोर्चा काढण्यात येणार होता.

पत्रकार परिषदेत ऍड. आंबेडकर म्हणाले, एकबोटेंना अटक झाल्यानंतर भिडे यांनाही पकडण्यात येईल, अशी अपेक्षा होती; पण सरकारकडून हालचाल झाली नाही. मोर्चाला सरकारने परवानगी नाकारून लोकशाहीचा गळा दाबला आहे. आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला आहे. या मोर्चाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिफॉर्मिस्ट) नेते समाधान नावकर, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे; तसेच राज्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com