...तर पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागेल : मलिक

...तर पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागेल : मलिक

पिंपरी: बुलेट ट्रेनचे ४० हजार कोटी रुपये आल्यानंतर परत पाठवणे शक्य नाही. जर, ते पाठवले असतील, तर पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागेल.राजीनामा द्यावाच लागेल असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी सोमवारी केला.

बुंद से गयी वो हौदसे नही आती.भाजप उघडं पडल्यानंतर ते झाकण्यासाठी असे बोलत आहेत, असे मलिक म्हणाले.माजी मंत्री आणि भाजपचे नेते अनंत हेगडे यांनी बुलेट ट्रेनचे ४० हजार कोटी रुपये परत पाठवण्यासाठी ८० तासासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते,असे वक्तव्य काल केले.त्याचा आणि भाजपचाही चांगलाच समाचार मलिक यांनी आज घेतला.

ते म्हणाले, हा महाराष्ट्रावर अन्याय नाही, तर देशातील राज्यांवर अन्याय आहे. ही आग देशभर पसरेल. बंगाल, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यातील जनता राज्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही दरम्यान, फडणवीस यांनी हेगडे यांचा आरोप फेटाळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com