पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयावरून श्रेयाची लढाई

पिंपरी-चिंचवडसह राज्यात तीन नवी पोलिस आयुक्तालये सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात न करतात तोच त्यावरून श्रेयाची रंगबाजी सुरु झाली आहे. त्यात शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पहिली बाजी मारली आहे. आपल्या मागणीचे हे यश असल्याचा दावा त्यांनी फेसबुकवर केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयावरून श्रेयाची लढाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह राज्यात तीन नवी पोलिस आयुक्तालये सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात न करतात तोच त्यावरून श्रेयाची रंगबाजी सुरु झाली आहे. त्यात शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पहिली बाजी मारली आहे. आपल्या मागणीचे हे यश असल्याचा दावा त्यांनी फेसबुकवर केला आहे.

दरम्यान, राज्यातील या प्रश्नी खासदारांनी श्रेय घेतल्याने त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय हे आपल्या मागणीचे यश असल्याची पोस्ट आढळराव यांनी फेसबुकवर टाकली. पिंपरी चिंचवडच्या भयमुक्त कारभारासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे एक पाऊल पुढे असेही त्यांनी पुढे म्हणत भाजपलाही कोपरखळी मारली आहे. भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त कारभार ही भाजपची घोषणा असली, तरी त्याची अंमलबजावणी आपण केली असल्याचे आढळराव यांनी यांच्या एक पाऊल पुढे या वाक्यातून सुचित केले आहे.

वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, गुन्हेगारीकरण यामुळे आघाडी सरकार असल्यापासून पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय करावे, असा आपला पाठपुरावा सुरु होता, असे आढळराव यांनी यासंदर्भात म्हणाले. पुढे युतीचे सरकार आल्यावरही पाठपुरावा चालू राहिला. गेली चार वर्षे त्यासाठी पत्रव्य़हार सुरु होता, असे ते म्हणाले. यावर्षी 17 जानेवारीला पुन्हा याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.त्यावर गृह विभागाच्या अपर सचिवांना कार्यवाही करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, अशी माहितीही आढळराव यांनी दिली.त्यानंतर नुकतीच विधानसभेत ही घोषणा झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, हा प्रश्न मार्गी लागण्यास पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही आमदारांचेही प्रयत्न कारणीभूत असल्याची कबुली आढळराव यांनी दिली आहे. आपल्या पक्षाचे शहरातील आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांच्या जोडीने त्यांनी आपले कट्टर राजकीय शत्रू आणि लोकसभेचे संभाव्य प्रतिस्पर्धी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा प्रथमच नामोल्लेख केला.

दरम्यान, याप्रश्नी शहरातील तिन्ही आमदार प्रत्येक अधिवेशनात लक्षवेधी आणि ताराकिंत प्रश्न देत होते. तसेच त्यांचाही पत्रव्यवहार सुरु होता. या अधिवेशनातही या विषयावर लक्षवेधी आणि ताराकिंत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, गोंधळामुळे तो पटलावर आला नाही. मात्र, अर्थसंकल्पावरील चर्चेत लांडगे यांनी पोलिस आयुक्तालयाचा उल्लेख करीत त्याची मागणी केली होती. त्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत ही घोषणा केली. 

बहुधा 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी शहराचे नवे पोलिस आयुक्तालय सुरु होण्याची शक्यता आहे. तसे संकेत भाजपचे शहरातील आमदार लक्ष्मण जगताप यांनीही काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. मात्र,
खासदार दादांनी याप्रश्नी श्रेय प्रथम घेतल्यावर थेट प्रतिक्रिया देणे त्यांनी खुबीने टाळले. याबाबत आमदार दादांनाच (लांडगे) विचारा, असे सांगत त्यांनी हा चेंडू आपले सहकारी महेशदादांकडे मोठ्या मुत्सद्देगिरीने टोलविला. 

महेशदादा यांनी सध्या कुठल्याच वादात न पडता फक्त कामावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: मोठा पाठपुरावा केलेल्या कामाचे पहिले श्रेय आपल्या एक नंबरच्या शत्रूंनी घेऊनदेखील त्यावर प्रतिक्रिया देणे पसंत केले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com