राष्ट्रवादीच्या 'त्या' स्वार्थी नेत्यांना जनता धडा शिकवेल : शशिकांत शिंदे 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीतील निष्ठावंतांनी भाजपचा रस्ता धरल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांत अस्वस्थतेची लाट पसरली आहे. आता पक्षाचे काय होणार या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निष्ठेने व एकत्रितपणे भाजपच्या रणनितीचा सामना करण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादीच्या 'त्या' स्वार्थी नेत्यांना जनता धडा शिकवेल : शशिकांत शिंदे 

सातारा : ''राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे सत्ता नसल्याने विकास होत नाही, पक्षात अन्याय होतोय, असे सांगून काही नेते मंडळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वाटेवर गेली आहेत. ही त्यांची भुमिका स्वार्थीपणाची आहे. त्यांना या निवडणुकीत सर्वसामान्य जनता त्यांची जागा दाखवेल. त्यामुळे आगामी काळाता पवार साहेबांवर निष्ठा दाखविणाऱ्या प्रमाणिक व तरूण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाची नव्या दमाने उभारणी केली जाईल,'' असा विश्‍वास राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. साताऱ्याचा बालेकिल्ला भाजपकडून पोखरण्याचा प्रयत्न केल्यास येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत एकत्रितपणे जशास तसे उत्तर देत बालेकिल्ला अबाधित राखतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीतील निष्ठावंतांनी भाजपचा रस्ता धरल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांत अस्वस्थतेची लाट पसरली आहे. आता पक्षाचे काय होणार या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निष्ठेने व एकत्रितपणे भाजपच्या रणनितीचा सामना करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ''राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेली 20 वर्षे पक्षात राहून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या छत्रछायेखाली राहून सत्ता असताना विविध पदे, मंत्रीपदे अनेकांनी भोगली. आता पक्षाची सत्ता नाही, हे कारण करून विकास कामे होऊ शकत नाहीत.राष्ट्रवादीत आपल्यावर अन्याय होते, असे सांगून काही दिग्गज नेते मंडळी निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वाटेवर गेली आहेत. राष्ट्रवादीकडे सत्ता नाही म्हणून पक्ष सोडून जाणारे खरे स्वार्थी आहेत. त्यांना या निवडणुकीत सर्वसामान्य जनता त्यांची जागा दाखवेल,''

ते पुढे म्हणाले, ''संपूर्ण महाराष्ट्रात खासदार शरद पवार हा एकमेवर नेता सर्व जनतेच्या प्रश्‍नासाठी सातत्याने धडपत आहेत. सत्ता असो अथवा नो त्यांची बांधिलकी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यावर भर देणारी राहिली आहे. त्यामुळे या सर्वांच्या पक्ष सोडून जाण्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. उलट आमच्यासारखे निष्ठा दाखविणारे प्रामाणिक कार्यकर्ते पवार साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एका पक्षाची बांधणी करतील व नव्या दमाने पक्षाची उभारणी करतील. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो ढासळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. मात्र, त्यांना यामध्ये यश येणार नाही. राष्ट्रवादीचे सर्व नेते, कार्यकर्ते एकत्रितपणे त्यांच्याविरोधात लढा देऊन बालेकिल्ला अबाधित ठेऊन दाखवतील.'' पुन्हा एकदा कै. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मागे जिल्हा उभा आहे, हे दाखवून देतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com