पाकिस्तानची भीती दाखवून मोदी करताहेत जनतेची दिशाभूल - पवन खेरा

राज्यात पूरस्थिती आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्तेच्या संघर्षात व्यस्त आहेत. आणि भारतापुढे पाकिस्तानची क्षमता काहीही नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानची भिती दाखवून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केला.
पाकिस्तानची भीती दाखवून मोदी करताहेत जनतेची दिशाभूल - पवन खेरा

नागपूर - राज्यात पूरस्थिती आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्तेच्या संघर्षात व्यस्त आहेत. आणि भारतापुढे पाकिस्तानची क्षमता काहीही नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानची भिती दाखवून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केला.

भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध कॉंग्रेस देशभरात 15 नोव्हेंबरपर्यंत आंदोलन करीत आहेत. आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज ते नागपुरातील प्रेस क्‍लबमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी रसातळाला चाललेली अर्थव्यवस्था, इतिहासातील सर्वाधिक बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यावर काहीही बोलत नसल्याचे ते म्हणाले. भारतापुढे पाकिस्तानची काहीही क्षमता नाही. मात्र, या पाकिस्तानची भीती दाखवून पंतप्रधान मोदी जनतेची दिशाभूल करीत आहे. बेरोजगारीने 72 वर्षांचे विक्रम मोडित काढले. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यापूर्वीसारखी स्थिती देशात आणून ठेवली. गेल्या साडेपाच वर्षात यांनी जे देशाला दिले, त्यातून जनता रडत आहे, असा टोलाही खेरा यांनी हाणला. गुंतवणुकीतही मोठी घट झाली. सामाजिक शांततेमुळे गुंतवणूक वाढते. परंतु भाजपने सामाजिक शांततेलाच सुरुंग लावला, असा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या या धोरणाविरुद्ध कॉंग्रेस प्रत्येक शहरात आजपासून 15 नोव्हेंबर आंदोलन करीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कॉंग्रेसने नेहमीच संवादातून देशाचे तसेच नागरिकांचे हित जपले. मात्र, भाजपचा वादविवादावर अधिक विश्‍वास आहे. भाजपचे राजकारणच वादविवादावर आधारित असल्याचे ते म्हणाले. भारतात व्हॉट्‌स ऍपने अनेकांचे 'फोन टॅप' केले. हा गुन्हाच आहे. मात्र, याबाबत केंद्रीय मंत्री काहीही उत्तर देण्यास सक्षम नाही, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. 
राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी आमदारांची खरेदी-विक्री ही भाजपची निती आहे. ईडी, सीबीआयसोबत भाजपची युती आहे, असे नमुद केले. 

डॉ. मनमोहन सिंग यांनी यूपीएच्या काळात नागरिकांच्या खरेदीची क्षमता वाढविली. त्यामुळे अर्थव्यवस्था टिकून राहीली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या खरेदीची क्षमता वाढविण्याऐवजी मोठमोठ्या भांडवलदारांवर मेहरनजर दाखविली. त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळल्याते ते म्हणाले.

शिवसेनेला समर्थनबाबत मौन
राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला समर्थन देणार काय? या प्रश्‍नावर मात्र त्यांनी मौन बाळगले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात निवडणुकीबद्दल चर्चा झाली. यावर त्यांच्यातील बैठकीचा तपशील माहित नसल्याचे नमुद करीत त्यांनी हात झटकले. राज्यात प्रदेश कॉंग्रेसचे नेते प्रचारासाठी सक्षम होते. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सभा भाजपच्या तुलनेत कमी झाल्या, असे सांगून त्यांनी पंतप्रधान मोदींना तेवढेच काम आहे, असा टोलाही हाणला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com