जळगाव : ''पाणी पुरवठा व स्वच्छता ही दोन खाती अत्यंत महत्वाची आहे. शहरी भागापासून तर थेट गाव,खेडे, तांडे येथे राहणाऱ्या लोकांचा हा दैनदिन जीवनाशी निगडीत विषय आहे. पाणी देणे हे आपल्यात पुण्यकर्म करणे मानले जाते. मला या राज्यातील सर्व जनतेला शुध्द आणि चांगले पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची संधी शासनाच्या माध्यमातून लाभली आहे. या शिवाय स्वच्छता हे महत्वाचे खातेही माझ्याकडे आहे. मी निश्चितच संधीचे सोने करणार आहे,'' असे पाणी पुरवठा मंत्री शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपद देण्यात आले आहे. याबाबत ते म्हणाले, ''पक्षाचे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मला महत्वाचे खाते दिलेले आहे. पाणी व स्वच्छता हे दोन्ही दैनदिंन जीवनाशी निगडीत विषय आहेत. विशेषत: पाणी हा माझा आवडता विषय आहे. शहरी व ग्रामीण भागात जनतेला चांगला पाणी पुरवठा करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.''
ते पुढे म्हणाले, ''गाव खेड्यात राहत असल्यामुळे तेथील पाण्याच्या समस्या मला माहित आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जनतेला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी योजना राबविण्याचा माझा प्रयत्न राहिल. शिवाय तांडे आणि वाडे या ठिकाणी पाणी पुरवठयाच्या सुविधा देण्यासाठी मी योजना तयार करणार आहे. या शिवाय शहरात तसेच गाव खेड्यात स्वाच्छतेसाठीही योजना राबविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.