एकनाथ शिंदे जे ठरवतील तेच पालघरला होईल ! 

एकनाथ शिंदे जे ठरवतील तेच पालघरला होईल ! 

पुणे : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपने अद्याप उमेदवार जाहीर न करण्यामागे पालघर नगरपरिषद निवडणूक हे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कधी नव्हे ती शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. यामध्ये दोन माजी नगराध्यक्षांसह शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची केलेल्यांला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

काही असले तरी शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे जे ठरवतील तेच पालघरला फायनल होईल असे दिसते. 

उद्या (रविवारी) नगरपरिषदेसाठी मतदान झाले की कोणत्याही क्षणी उमेदवार जाहीर केला जाईल पण तो उमेदवार शिवसेनेचा असेल की भाजपचा हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 
युतीच्या जागा वाटपात पालघरची जागा आम्हालाच हवी अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे. युतीसाठी काही जागांबाबत तडजोड करण्यास भाजपने तयारी दाखविली आहे.

दिवंगत खासदार चिंतामन वनगा यांच्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने वनगा यांचे पूत्र श्रीनिवास यांना पक्षात घेऊन भाजपला दे धक्का दिला होता. तर भाजपने कॉंग्रेसचे डॉ. राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन तिकिट दिले होते. गावित निवडूनही आले होते. मात्र शिवसेना भाजपवर प्रचंड नाराज होती. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा युती झाल्याने या जागेवर शिवसेनेने हक्क सांगितला असला तरी स्वत: गावित यांना ते मान्य नाही. ही जागा भाजपलाच मिळायला हवी अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांची आहे.

मात्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी द्यायची की हा मतदारसंघ भाजपला सोडून द्यायचा याचा निर्णय होऊ शकला नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे जे ठरवतील तेच फायनल होईल असे दिसते. 

गेल्या पंधरा दिवसापासून स्वत: शिंदे हे पालघरमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी तळ ठोकून आहेत. याचे कारण असे की कधी नव्हे ती शिवसेनेत बंडखोरी झाली आहे.

शिवसेनेचे काही निष्ठावंत पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्षा अंजली परेश पाटील, विद्यमान नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी शिवसेनेला आव्हान देत अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. शिवसेनेतील बंडखोरीमुळे दगाफटका होऊ नये यासाठी मंत्री शिंदेंना पालघरला तळ ठोकावा लागला आहे. 

उद्या नगरपरिषदेसाठी मतदान आहे. युतीचा उमेदवार जाहीर झाला असता तर उद्याच्या मतदानावर परिणाम झाला असता म्हणून युतीचा उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. जर शिवसेनेला तिकीट मिळाले असते तर भाजप आणि भाजपला तिकीट मिळाले असते शिवसेना नाराज झाली असती त्यामुळे पालघरचा निर्णय होऊ शकला नाही. 

नगरपरिषदेचे निकाल काय लागतो. यावरही लोकसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. जर उद्या ठाकूरांच्या आघाडीकडे सत्ता आली तर त्याचा फटकाही युतीच्या उमेदवाराला बसू शकतो. युतीची सत्ता आल्यास त्याचा फायदा जो कोणी उमेदवार असेल त्यालाही होऊ शकतो. 

शिवसेनेच्या बंडखोरांना शांत करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले तर युतीच्या उमेदवाराला वाट सोपी आहे अन्यथा खडतर आहे अशी येथील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com