शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा करणारा गट पुन्हा  सक्रीय ?

.
UDDHAV-THAKRE-NARENDRA-MODI
UDDHAV-THAKRE-NARENDRA-MODI

मुंबई:   मोदी लाट ओसरली असल्यानचे विधानसभा निवडणूक निकालांनी स्पष्ट केले असल्याने आता सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार व्हावा अशी भूमिका शिवसेनेतून मांडली जाते आहे. भाजपला सोडले तर आपल्या किती जागा निवडून येतील याचा विचार करणे सध्या सुरू आहे. 

 नाराजीचा फटका आपल्यालाही बसणार असल्याने समवेत रहाण्यातच फायदा असल्याचे मतही दुसऱ्या गटाने मांडले आहे.भाजप सध्या अडचणीत असल्याने अधिक पदरी पाडून घेण्याची ही वेळ असल्याचे शिवसेनेतील बहुतांश मंडळींचे मत आहे. 

मध्यप्रदेश ,राजस्थानच्या तसेच तेलंगणाच्या निकालांचे वस्तुनिष्ठ विश्‍लेषण केल्यानंतरच योग्य त्या निर्णयापर्यंत येणे योग्य ठरेल असे सेनेतील काही ज्येष्ठांचे मत आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांची निकालानंतरची पहिली प्रतिक्रिया भाजपच्या विरोधात जाणारी आहे.

सरकारमध्ये सामील होवू नये असे उदधव ठाकरे यांचे मत होते ,मात्र सहकाऱ्यांनी सातत्याने धरलेल्या आग्रहामुळे शिवसेना सत्तेत गेली,आता स्वतंत्र अस्तित्व राखायचे असेल तर योग्य तो निर्णय घ्यावा असे सांगितले जाते आहे. येते पंधरा दिवस सेनेच्या विचारमंथनात महत्वाचे असतील असे एका माहितगाराने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com