औरंगाबाद : "गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्नावर नुसते बोलले जात होते, पण बाळा तू पाणी आणले, आता तुलाचा निवडून देणार'' अशा शब्दांत एका आजीबाईंनी अतुल सावे यांना आशिर्वाद दिला. प्रचारफेरी दरम्यान शहरातील बायजीपुरा भागात सावे यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आजीबाईंनी शहरासाठी पाणी योजना मंजुर केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.
पूर्व मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांच्या प्रचारसभा, पदयात्रांना शहरात उत्सर्फूत प्रतिसाद मिळत आहे. बायजीपुरा भागात मतदारांच्या भेटीगाठी घेत असतांना एका ओट्यावर बसलेल्या आजीबाईंशी सावेंनी संवाद साधला.
आजी कशा आहात? अशी त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली, मला मतदान करणार का आजी? असे सावे यांनी विचारताच 'बाळा तु पाणी आणले, तुलाच निवडूण देणार' अशा शब्दांत आजींनी सावेंना आशिर्वाद दिला. जनता केलेल्या कामांची पावती देत असते, याची प्रचिती पदोपदी येत आहे. आजींनी दिलेली प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाची आहे, अशामुळेच विकासकामे करण्यासाठी मला प्रेरणा मिळेत अशा भावना सावे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.