खडसेच काय भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय झाले : नवाब मलिक 

खडसेच काय भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय झाले : नवाब मलिक 

मुंबई : सत्तेचे आमिष दाखवल्याने राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार आता पुन्हा शरद पवारसाहेब यांच्या संपर्कात आहेत असे स्पष्ट करतानाच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेच नव्हे तर भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय झाला अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली. 

70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला असा दावा भाजप करत सातत्याने करीत आला मात्र या चौकशीतून काहीही बाहेर आले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मलिक म्हणाले,की सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला होता.

चौकशी झाली मात्र काही निघाले नाही. आता या घोटाळ्यात अजितदादांचा कुठलाही रोल नाही असे प्रतिज्ञापत्रच न्यायालयात देण्यात आले आहे.आम्ही आधीपासून सांगत होतो की अजितदादांचा या घोटाळ्यात सहभाग नाही. भाजपने केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत होते हे आता सिद्ध झाले आहे. 

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com