मंत्री मंडळविस्तारात सोलापूर जिल्ह्याला स्थान नाही ; कार्यकर्ते नाराज 

सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान राहिलेले आहे . त्यामुळे मंत्रिमंडळ कोणाचेही असो सोलापूर जिल्ह्याला त्यात हमखास स्थान असे .
solapur-politics-
solapur-politics-

पंढरपूर :  राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान राहिलेले आहे . त्यामुळे मंत्रिमंडळ कोणाचेही असो सोलापूर जिल्ह्याला त्यात हमखास स्थान असे . 

या पार्श्वभूमीवर काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यात नाराजी आहे . शिवसेनेचे नेते आमदार तानाजी सावंत यांना  ऐनवेळी  डावल्याने शिवसैनिकांमधून  तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 


तर  पंढरपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही  आमचा अपेक्षा भंग झाल्याच्या भावना व्यक्त  केल्या. एकूणच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा व्यक्त केली जात आहे.


विधासनभा निवडणूक निकाला नंतर राज्यात नव्याने जुळून आलेल्या राजकीय समिकरणामुळे अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. राजकीय उलथापालथीमध्ये  सोलापूर जिल्ह्यातील आमदार बारीक लक्ष ठेवून होते.


राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भूम परांडा विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे मंत्री मंडळातील स्थान पक्के मानले जात होते.शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्यावर पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणूकीची पूर्ण जबाबदारी टाकली होती. 


या तानाजी सावंत काही प्रमाणात यशस्वी देखील झाले. रविवारी (ता.30) रात्री पर्यंत तानाजी सावंत यांचे मंत्रीमंडळाच्या संभाव्य यादीत फिक्स होते. परंतु ऐनवेळी सावंतांना डावलण्यात आल्याने तानाजी सावंत कमालीचे नाराज झाले आहेत. तानाजी सावंतांना डावल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.


तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकें यांचेही नाव सुरवातीपासून आघाडीवर होते. भालकेंना सोलापूरचे पालकमंत्रीपद मिळणार या विषयी सोशल मडियातून वारंवार चर्चा सुरु होती. आमदार भालकेंना मंत्री मंडळात घ्यावे यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी शरद पवारांना साकडे घातले होते. 


परंतु निवडणुकी पूर्वी आमदार भालकेंच्या तळ्यात मळ्यातील राजकीय भूमिकेमुळे त्यांचे नाव ऐनवेळी कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्या बाबतीत हाच निमय लागू झाल्याने आमदार बबन  शिंदेंच्या नावाची विचार होऊ शकला नाही.


काँग्रेस पक्षातर्फे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या प्रणिती शिंदे यांच्या नावाचा राजमंत्री पदासाठीही विचार झालाय नाही म्हणून त्यांच्या समर्थकांत नाराजी आहे . 


आमदार भारत भालके, बबन शिंदे आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची संधी हुकल्याने त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर विशेषतः उद्या होणार्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com