सातारा जिल्ह्यात प्रवेश बंदी, नियम मोडल्यास कडक कारवाई : शेखर सिंह

सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. मुंबईहून साताऱ्यात येणाऱ्यांना कोणतीही मुभा जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न कोणी करेल त्यावर कडक कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे
No Entry in Satara District Announces  Collector Shekhar Singh
No Entry in Satara District Announces Collector Shekhar Singh

सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश केला असून आता संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. मुंबईहून साताऱ्यात येणाऱ्यांना कोणतीही मुभा जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न कोणी करेल त्यावर कडक कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने कडक भुमिका घेतली आहे. गेल्या आठवडाभरात बंद असूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. तसेच मुंबईहून अनेकजण सातारा जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. तसेच सध्या साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून काही कारखाने बंद झाले आहेत. या कारखान्यांकडे असलेले ऊस तोडणी मजूर व कामगार यांना आता घराकडे जाण्याचे वेध लागले आहेत. पण हंगाम संपला तरी शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही जिल्ह्यातून बाहेर सोडले जाणार नाही. 

त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनांशी संपर्क करून त्यांच्याकडे असलेले ऊस तोडणी वाहतूक करणारे मजूर व कामगार यांना सोडू नये, अशा सूचना केल्या आहेत. तसेच या मजूरांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच थांबावे, त्यांची सर्व सोय कारखाना व्यवस्थापनाने करावी, अशी सूचना केली आहे. तरीही काही कामगार टोळ्या जिल्हा सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. अशा टोळ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. सिंह यांनी दिला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करून तेथे नाकाबंदी केली आहे. तरीही मुंबईहून साताऱ्यात येण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. आजपासून कोरोनाचा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत असून त्यामुळे संसर्ग वाढण्याची भिती असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक भुमिका घेतली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. जे या नियमाचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. सिंह यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com