युतीच्या अनिश्‍चिततेने लोकसभेचा प्रचाराबाबत सध्यातरी 'ठंडा, ठंडा, कुल, कुल' वातावरण

शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या राजकीय चर्चेत रोज नव्या बातम्यांची भर पडत असते. निवडणुकीची घोषणा महिनाभरावर आलेली असतानाही जिल्ह्यातील विद्यमान उमेदवारांना कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असे कळते. युतीच्या या अनिश्‍चिततेने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सामसुम आहे. जिल्ह्यातील खासदार याविषयी मौन बाळगणेच पसंत करतात. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकीची हवा अगदीच 'थंडा, थंडा, कुल, कुल' आहे.
युतीच्या अनिश्‍चिततेने लोकसभेचा प्रचाराबाबत सध्यातरी 'ठंडा, ठंडा, कुल, कुल' वातावरण

नाशिक : शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या राजकीय चर्चेत रोज नव्या बातम्यांची भर पडत असते. निवडणुकीची घोषणा महिनाभरावर आलेली असतानाही जिल्ह्यातील विद्यमान उमेदवारांना कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असे कळते. युतीच्या या अनिश्‍चिततेने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सामसुम आहे. जिल्ह्यातील खासदार याविषयी मौन बाळगणेच पसंत करतात. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकीची हवा अगदीच 'थंडा, थंडा, कुल, कुल' आहे.

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेचे नाशिक, नगर दक्षिण, जळगाव, रावेर हे खुले तर धुळे, नंदुरबार, दिंडोरी हे आदिवासी राखीव आणि शिर्डी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असे आठ मतदारसंघ आहेत. या सर्व जागा शिवसेना, भाजपकडे आहेत. विशेषतः नाशिक, शिर्डी हे शिवसेनेकडे तर उर्वरीत सहा मतदारसंघ भाजपकडे आहेत. त्यादृष्टीने हे सर्वच विद्यमान खासदार प्रारंभापासुन हमखास उमेदवारी मिळणार, यादृष्टीने तीन- चार महिन्यापुर्वी प्रचाराच्या नियोजनात व्यग्र झाले होते. सध्या मात्र युती होणार की नाही, त्याची घोषणा केव्हा होणार, वाटाघाटींत आपला मतदारसंघ आपल्याच पक्षाकडे राहील अथवा नाही याविषयी रा जकीय अनिश्‍चितता आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असतांना मतदारसंघात प्रचाराचा मागमुसही जाणवत नाही.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (धुळे) आणि दिलीप गांधी (नगर) यांनी मतदारसंघात दौरे सुरु केले आहेत. त्यांच्या प्रचाराच्या बैठकाही होत आहेत. उर्वरीत खासदारांमध्ये मात्र अनिश्‍चितता आहे. विशेषतः डॉ. हिना गावीत (नंदुरबार), रक्षा खडसे (रावेर) यांच्या उमेदवारीविषयी पक्षातच वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. पर्यायांवर चर्चा होत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत युती होणार की नाही, याबाबत काहीही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. किंबहुना त्यानंतर गोंधळ अधिकच वाढल्याने त्या दिवशी शिवसेनेच्या खासदारांनी दूरध्वनीवरुन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांना काहीही संकेत दिले नाही. काहींनी तर पत्रकार, मतदारसंघातील नेत्यांच्या दूरध्वनीला उत्तरच दिले नाही.  सध्या सर्व खासदार संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत व्यग्र आहेत. मात्र, मतदारसंघात त्यांचे अनुयायी आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. मार्च महिन्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

महाराष्ट्रात युतीचा मतदार आहे. शिवसेनेला खुप अनुकुल वातावरण आहे. निश्‍चित माहिती नाही, मात्र त्यादृष्टीने काही शक्ती गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात असु शकतात. त्यामुळे प्रचार केव्हा, कसा करायचा हा प्रश्‍न नक्कीच आहे. शेवटी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब जेव्हा आदेश देतील तक्षणी शिवसेनेची प्रचार यंत्रणा सक्रीय होईल- नगरसेवक अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, नाशिक महापालिका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com