युतीबाबत माझ्याकडून काहीच चर्चा नाही : उद्धव ठाकरेंचा तोरा कायम

युतीबाबत माझ्याकडून काहीच चर्चा नाही : उद्धव ठाकरेंचा तोरा कायम

महाड : शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते अधीर झाले असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपला भाजपविरोधातील आवेश कायम ठेवला आहे. युतीबाबत माझ्याकडून काहीच चर्चा नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला विश्वास कायम ठेवला.

महाड येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. त्यांनी भाजप नेत्यावर टीका करण्याची मोहीम कायम ठेवली. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार. पण तो होईपर्यंत मदांध हत्तीवर अंकुश मारणारच असल्याचे त्यांनी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराचा खटला तीन मिनिटांत उडवला. मी आता याबाबत अयोध्येत जाऊन मोदींना या मंदिराबाबत प्रश्न विचारणार आहे, असा इरादा त्यांनी जारी केला. 

भाजपने केलेल्या घोषणा या `चुनावी जुमला` असल्याचे नितीन गडकरी सांगतात. हा निर्लज्जपणा आहे. आम्हाला आशा थापाड्यांची गरज नाही. आता पुन्हा गाजराच्या पिकाला पाणी देणार आहे का ?
पाण्याचा दुष्काळ आहे, पण थापांचा दुष्काळ कुठे आहे? निवडणुका येताच भ्रमाचे भोपळे, गाजरं गावागावात वाटली जातील. तेव्हा सावध राहा, असे आवाहन त्यांनी केले.

 पाऊस बरसला नसता तर गेली २-३ वर्ष चांगली गेली नसती.  प्रश्नाच्या मुळापर्यंत न जाता वरवर कामे करतात. सरकार येते आणि जाते पण दुष्काळ काही पाठ सोडत नाही.  विजयाचे खरे शिल्पकार शिवसैनिक आहेत, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आमदार भरत गोगावले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com