भिवंडी महापालिकेस कायमस्वरूपी आयुक्त नसल्याने पालिकेचा कारभार वाऱ्यावर

भिवंडी महापालिकेचे आयुक्त मनोहर हिरे हे सेवानिवृत्त होताच शासनाने पालिकेचा कारभार पाहण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कडे प्रभारी कार्यभार दिला आहे मात्र ते पूर्ण वेळ पालिकेत देऊ न शकल्यामुळे सध्या भिवंडी मध्ये नागरी समस्यांचा बोजवारा उडाला आहे.
भिवंडी महापालिकेस कायमस्वरूपी आयुक्त नसल्याने पालिकेचा कारभार वाऱ्यावर

भिवंडी : भिवंडी महापालिकेचे आयुक्त मनोहर हिरे हे सेवानिवृत्त होताच शासनाने पालिकेचा कारभार पाहण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कडे प्रभारी कार्यभार दिला आहे मात्र ते पूर्ण वेळ पालिकेत देऊ न शकल्यामुळे सध्या भिवंडी मध्ये नागरी समस्यांचा बोजवारा उडाला आहे.

गेल्या आठ दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे प्रभाग समीती अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छते कडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ठेकेदार कचरा उचलण्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. शासनाने या प्रकरणी लक्ष घालून तातडीने भिवंडी महापालिकेस कायम स्वरूपी आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते खालिद गुडु शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे 

गेल्या काही दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सखल भागात पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नाले व गटारांची साफसफाई न झाल्यामुळे गटारीचे व ड्रेनेजचे सांडपाणी लोंकांच्या दुकानामध्ये व घरांमध्ये गेल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगर पालिकेने गटार व नाले सफाई साठी लाखो रुपये खर्च केल्याचा दावा करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गटार सफाई न झाल्यामुळे नागरिकांचे पडलेल्या पाऊसामुळे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खालिद गुडु यांनी केला आहे. 

नियमित कचरा उचलणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे त्यासाठी पालिका घंटा गाडी ठेकेदारास दरमहा 70 लाख रुपये खर्च करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलणे काम विविध प्रभागात बंद झाल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत जंतुनाशक औषध फवारणी बंद झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

या बाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोकुमार रणखांब यांच्या सह प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून सुद्दा ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवक व नागरीक करीत असुन शहरात संतापाची लाट पसरली आहे. महापालिकेत कायम स्वरूपी आयुक्त नसल्याने विविध प्रभागात बंद पडलेली अनधिकृत इमारतीची बांधकाम सुद्दा मोठ्या जोमाने सुरु झाली असून धोकादायक इमारतींमुळे दुर्घटना होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शासनाने या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी खालिद गुडु यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com