सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसून कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त हे डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीत राजकीय केंद्रे थंड आहेत.
सांगलीत कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण नाही. तिघेजण संशयित आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर कामाला लागले आहे. जमावबंदीचा आदेश नसला तरी सर्व गर्दीच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. मात्र या सगळ्या घाईत राजकीय घडामोडी ठप्प झाल्या आहेत.
पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगीळ यांनी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाचा सामना एकजुटीने करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या घडामोडी वेगात घडत असताना महापालिका मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची वर्दळ कमी झाली आहे. अधिकारी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना लोकप्रतिनिधी म्हणवणारे नगरसेवक मात्र नागरिकांना कुठेच आवाहन करताना दिसत नाहीत.
महापालिकेत स्थायी समितीची सभा आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवरही महापालिका थंडच आहे. नागरिकांच वर्दळही कमी झाली आहे. राजकीय घडामोडी नसल्याने, सार्वजनिक कार्यक्रम नसल्यानेही नेते, पदाधिकारी शांत आहेत. त्यांना बळेबळेच शांत रहावे लागत आहे हा भाग वेगळा. मात्र त्याशिवाय पर्याय नाही. इतर सर्व गोष्टींप्रमाणेच राजकीय नेत्यांनाही किमान ३१ मार्चपर्यंत शांतच रहावे लागणार आहे, हे निश्चित.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.