पुणे ः महाराष्ट्र बॅंक ही बॅंक आॅफ बडोदामध्ये सामील करण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र सरकारच्या पीक विमा कर्ज योजनेची एकूण छाननी करणाऱ्या कमिटीचे अध्यक्ष रवींद्र मराठे होते आणि गेल्या ४ वर्षाच्या काळात ही योजना फसली ह्याचे रिपोर्ट रवींद्र मराठेंनी दिला. ह्याचा राग सरकारला आहे. त्यामुळे त्यांनी मराठेंना शिक्षा दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी फडणवीस आणि भाजपवर टीका केली. तसेच बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील कारवाईत महाराष्ट्र बॅंकेतील अधिकाऱ्यांनाही अटक केल्याने त्याबद्दल सरकारला धारेवर धरले.
ते म्हणाले,``अमित शहांवर कारवाई नाही पण बँक ऑफ महाराष्ट्रच्या मराठेंवर कारवाई कशी होते? आणि मुख्यमंत्री म्हणतात की मला ह्या कारवाईची माहिती नाही, हे कसं शक्य आहे? चंदा कोचरवर कारवाई का नाही? मराठे यांनी जेव्हा पीककर्ज माफीतील गडबड उघड केली. तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्यावर भडकले होते, अशीही माहिती मिळत आहे.
स्वच्छ भारतच्या नावाखाली लोकांकडून फक्त टॅक्स घेतले गेले, पंतप्रधान ज्या मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघातील नदी त्यांना स्वच्छ नाही करता आली आणि हे काय स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारतात. एखाद्याला आलेला झटका हे राज्याचं धोरण होऊ शकत नाही, अशीही टीका त्यांनी केली. प्लॅस्टिक बंदीचा निर्णयाचा सामान्यांना त्रास होतोय, तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर बोलायला हवं, अशी सूचना त्यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.