राज्यात CAA लागू होणार नाही : नितीन राऊत

सीएए व एनआरसीबाबत कॉंग्रेसची केंद्रात जी भूमिका आहे, तीच राज्यातसुद्धा आहे.
nitin raut
nitin raut

नागपूर : सुधारित नागरिकत्त्व कायदा (सीएए) व एनआरसीवरून देशभरात विरोध प्रदर्शन सुरू आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने सीएए लागू करण्याबाबतची अधिसूचनाही काढली आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू न करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रही या राज्यात सामील झाला आहे. सीएए आणि एनआरसी महाराष्ट्रात लागू करणार नसल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

विदेशातील प्रताडीत हिंदुना भारतात नागरिकत्त्व देण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्त्व कायद्यात सुधारणा केली आहे. इतर देशातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनआरसी कायदा करणार आहेत. हे दोन्ही कायदे संविधानविरोधी असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. यामुळे देशातील नागरिकच घुसखोर ठरतील, असा आरोप विरोधकांचा आहे. याच्या विरोधात देशातील अनेक भागात आंदोलन होत आहे. अनेक पक्षांनी ही याला विरोध दर्शविला आहे. काही राज्यांनी हा कायदा लागू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. कॉंग्रेस पक्षानेही याला विरोध दर्शविला आहे. दरम्यान केंद्र सरकारने सीएए लागू करण्याबाबतची अधिसूचना काढली आहे. महाराष्ट्रात हा कायदा लागू होणार नसल्याने मंत्री राऊत यांनी सांगितले. 

सीएए व एनआरसीबाबत कॉंग्रेसची केंद्रात जी भूमिका आहे, तीच राज्यातसुद्धा आहे. त्यामुळे सीएए व एनआरसी राज्यात लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राऊत यांनीयेथे स्पष्ट केले. शनिवारी रविभवन येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या एका बैठकीसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आले होते. तेव्हा त्यांना यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com