नितीन गडकरी 55.67 टक्‍के मते घेऊन बनले विदर्भाचे  'मतसम्राट'

यवतमाळ-वाशीममध्ये भावना गवळी यांच्या झोळीत 5 लाख 42 हजार 98 मते मतदारांनी टाकलीत. मतांची टक्‍केवारी 46.17 आहे.
Gadkari-dhotre
Gadkari-dhotre

नागपूर:  ' रोडकरी' म्हणून संपूर्ण देशात विकास कामातून ठसा उमटविणारे नितीन गडकरी यावेळी विदर्भाचे ' मतसम्राट' झाले आहेत. त्यांनी एकूण मतांच्या 55. 67 टक्‍के मते मिळवून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत.

त्यांच्या पाठोपाठ वर्धा येथील भाजपचे खासदार रामदास तडस यांनी मते घेतली. त्यांनी 53.92 टक्‍के मते मिळाली आहेत. तर गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी विजयी उमेदवारांमध्ये सर्वांत कमी म्हणजेच 45.5 टक्‍के मते घेऊन विजय नोंदविला.

विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत. दहांपैकी भाजप-शिवसेना युतीने 8 जागांवर विजय मिळवून विदर्भात एकहाती वर्चस्व असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.

यातील नितीन गडकरी यांच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्यावेळेस साडेतीन लाखांपेक्षा अधिक मतांनी ते विजयी झाले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. एवढेच नव्हेतर पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात होते.

 नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 6 लाख 6 हजार 221 ऐवढी मते मतदारांनी त्यांच्या झोळीत टाकली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी नाना पटोले यांना 4 लाख 44 हजार 212 मतांवर समाधान मानावे लागले. गडकरी हे दोन लाख 16 हजार 2 मतांनी विजयी झाले असून मतांची टक्‍केवारी 55. 67 आहे. दहाही मतदारसंघातील उमेदवारांपेक्षा ती अधिक आहे. 

दुसऱ्या क्रमांकावर वर्धा येथील भाजपचे उमेदवार रामदास तडस आहेत. त्यांनी 53.92 टक्‍के मते घेतली. त्या खालोखाल भाजपचे भंडारा येथील उमेदवार सुनील मेंढे यांना मते मिळाली आहेत. त्यांनी 6 लाख 50 हजार 243 मते म्हणजे 52. 23 टक्‍के मते घेतली. चंद्रपूर येथील कॉंग्रेसचे उमेदवार बंडू धानोरकर यांना 45.18 टक्‍के मते मिळाली. अंत्यत कमी फरकाने ते विजयी झालेत. त्यांना 5 लाख 59 हजार 507 मते मिळाली आहेत. 

बुलडाण्याचे शिवसेनेचे उमेदवार प्रताप जाधव यांनी 46.59 टक्‍के मते घेतली आहेत. अकोल्याचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांना 49. 53 टक्‍के मते मिळाली. अमरावतीच्या युवा स्वाभीमानीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी 45.93 टक्‍के घेतली आहेत. त्यांना 5 लाख 10 हजार 947 मते मिळाली.

यवतमाळ-वाशीममध्ये भावना गवळी यांच्या झोळीत 5 लाख 42 हजार 98 मते मतदारांनी टाकलीत. मतांची टक्‍केवारी 46.17 आहे. तसेच रामटेक मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेले कृपाल तुमाने यांच्या मतदानाची टक्‍केवारी 49.9 असून त्यांना 5 लाख 97 हजार 126 मते मिळाली आहेत.

मतांतील मताधिक्‍यात धोत्रे पुढे
दोन उमेदवारांमधील मताधिक्‍यात अकोल्याचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे पुढे आहेत. त्यांना 5 लाख 54 हजार 444 ऐवढी मते मिळाली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी 2 लाख 78 हजार 848 ऐवढी मते घेतली. दोघांतील मतांचा फरक हा 2 लाख 75 हजार 596 ऐवढा आहे. तर सर्वात कमी फरकाने चंद्रपूरचे कॉंग्रेस उमेदवार बाळू धानोरकर निवडून आले आहेत. त्यांना 5 लाख 59 हजार 507 ऐवढी मते मिळाली. तर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी 5 हजार 14 हजार 744 ऐवढी मते घेतली आहे. 44 हजार 763 मतांनी बाळू धानोरकर विजयी झाले आहेत.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com