निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण केली - नितीन गडकरी

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या महिन्यात सुरू होईल, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्राची भरभराट ही देशाची भरभराट ठरणार आहे. नागपूरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे काम मी करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. केवळ नागपूरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करीत असल्याचा दावा त्यांनी केला.
निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण केली - नितीन गडकरी

नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपुरकरांना दिलेली संपूर्ण आश्‍वासने पूर्ण झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. नागपूर शहर भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीचा समारोप गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना गडकरी यांनी नागपूरकरांना निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाची आपण पूर्तता केल्याचा दावा केला. भाजप सत्तेवर येऊन केवळ साडेतीन वर्षे झाली आहे. अद्यापही केंद्रातील सरकारचे दीड वर्षे शिल्लक असताना गडकरी यांनी संपूर्ण आश्‍वासने पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. आता आश्‍वासने पूर्ण केल्याने पुढील निवडणुकीत कोणती आश्‍वासने जनतेला द्यावयाची, असे प्रश्‍न काहीजण उपस्थित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विदर्भासह महाराष्ट्राचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र मागे राहू नये, ही आपली इच्छा असून त्या दिशेने आपली वाटचाल सुरू असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्रात सिंचनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

नागपूरसह महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी कटिबद्ध आहे. येत्या 2 दोन वर्षात महाराष्ट्राची सिंचन क्षमता 40 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. सध्या राज्याची सिंचन क्षमता केवळ 22 टक्के आहे. शेतीला सिंचन नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. 40 टक्के सिंचन क्षमता झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असा दावाही त्यांनी केला. 

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या महिन्यात सुरू होईल, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्राची भरभराट ही देशाची भरभराट ठरणार आहे. नागपूरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे काम मी करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. केवळ नागपूरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करीत असल्याचा दावा त्यांनी केला. शहरातील 50 हजार लोकांना घरे देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यापैकी 10 हजार लोकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. नागपूरच्या विकासाची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आमदार व खासदारांची बैठक होणार असून तिथे विकास कामांचे सादरीकरण केले जाईल असेही गडकरी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com