... अखेर निपाणी कोल्हापूर महामार्ग सुरू; महामार्गावर वाहनांची वर्दळ 

अतिवृष्टी आणि वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी जवळील यमगरणी नदी पुलाजवळ महामार्गावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर आठ फूट पाणी साठले होते. रविवारी दुपारी हे पाणी कमी झाल्याने किरकोळ वाहनांना होळीपर्यंत सोडले जात होते. कागल जवळील आय बी पी पेट्रोल पंप जवळील पाणी सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कमी झाल्याने निपाणी -कोल्हापूर महामार्ग अखेर सुरू झाला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून प्रवाशांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
... अखेर निपाणी कोल्हापूर महामार्ग सुरू; महामार्गावर वाहनांची वर्दळ 

निपाणी : अतिवृष्टी आणि वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी जवळील यमगरणी नदी पुलाजवळ महामार्गावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर आठ फूट पाणी साठले होते. रविवारी दुपारी हे पाणी कमी झाल्याने किरकोळ वाहनांना होळीपर्यंत सोडले जात होते. कागल जवळील आय बी पी पेट्रोल पंप जवळील पाणी सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कमी झाल्याने निपाणी -कोल्हापूर महामार्ग अखेर सुरू झाला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून प्रवाशांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी नदी पुलाजवळ गेल्या सोमवारी रात्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वेदगंगा नदीचे पाणी पसरले होते. शिवाय हे पाणी प्रवाही असल्याने वाहनधारकांना होणाऱ्या धोक्याची खबरदारी घेऊन पोलिसांसह महसूल खात्याने सहा दिवसांपासून या महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे मांगुर फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहने थांबवून होती. याशिवाय  बेळगाव कडून येणारी सर्वच वाहने तवंदी घाट गोवावेस निपाणी महामार्ग आणि परिसरात थांबून होती. बऱ्याच दिवसापासून ही वाहने थांबल्याने मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक यांनी रविवारी सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास अवजड वाहन व्यतिरिक्त सर्वच वाहने सोडली होती. 

मात्र कोगनोळी च्या पुढील बाजूस असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पाणी साठवून असल्याने सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत वाहतूक थांबली होती. अखेर सकाळी दहा वाजता पाणी कमी झाल्याने निपाणी कोल्हापूर महामार्ग सुरू करण्यात आला आहे. 

तब्बल सहा दिवसानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने बऱ्याच दिवसांपासून खोळंबलेली वाहने एकाच वेळी रस्त्यावर धावू लागले आहेत.  सकाळच्या टप्प्यात किरकोळ प्रमाणात बससेवा सुरू असली तरी वडाप वाहतुकीची वाहने वाढली होती. आज तागायत शंभर वर्षांच्या इतिहासात तब्बल सात दिवस निपाणी कोल्हापूर हा महामार्ग बंद राहिला होता. त्यामुळे निपाणी परिसरात होणारी विवीध मालाची आवक थांबली होती. शिवाय पेट्रोल टंचाई निर्माण झाली होती.  अखेर महामार्ग सुरू झाल्याने मालवाहतूक सह इतर वाहने सुरू झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com