मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील महामंडळे बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उदधव ठाकरे लवकरच घेणार असल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
गेल्या सरकारने सर्व महामंडळांवर नियुक्त्या केल्या नसल्या तरी काही महत्वाच्या मंडळांवर माणसे नेमण्यात आली होती.भाजप आणि शिवसेनेशी संबंधित असलेल्या या नेत्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या लवकरच रदद करण्यात येतील.कॉंग्रेसने या संबंधात आग्रही भूमिका घेतली आहे.
सरकारच्या हालचालीमुळे शिवसेनेचे उदय सामंत यांच्यासारख्या नेत्यांची म्हाडाची विभागीय अध्यक्ष पदे अडचणीत येणार आहे . तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून शिवसेनेतर्फे साताऱ्यातून लोकसभा लढलेले नरेंद्र पाटील यांचे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळही धोक्यात आले आहे . चित्र ताई वाघ यांचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद धोक्यात आले आहे .
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.