मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली निकालावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की देशद्रोह्यांना मतदान करु नका, ते दिल्लीच्या जनतेने ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं, अशी बोचरी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.
भाजपने हजारो कोटी वाटूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली अशी प्रतिक्रिया मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तसे ट्वीटही त्यांनी केले आहे.
नवी दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या जागांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेला कल पाहता 'आप' ५४ जागांवर तर भाजप १६ जागांवर आघाडीवर आहे. अन्य पक्षांना अद्यापही खाते उघडता आलेले नाही. या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हॅटट्रीक करतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.