नवलखा, तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामिन नाकारला 

anand teltubde
anand teltubde

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. 

या दोघांनीही तीन आठवड्यांच्या आत शरण यावे असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा आणि न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. नवलखा आणि तेलतुंबडे यांनी आपले पासपोर्ट तातडीने जमा करावेत असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी नवलखा आणि तेलतुंबडे यांनी न्यायालयाने सहा मार्च पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. 

नवलखा आणि तेलतुंबडे यांना पुणे सत्र न्यायालयाने मागील वर्षी अटकपूर्व जामिन देण्यास नकार दिला होता. त्या विरोधात या दोघांनी दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळून लावल्या होत्या. 

पुणे जिल्ह्यातील कोरोगाव भीमा येथे एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर माओवाद्यांशी संबंध आणि इतर आरोप ठेवत नवलखा, तेलतुंबडे आणि इतरांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे आरोप सर्वच आरोपींनी फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com