भाजपसोबत जाऊन शिवसेना बिघडली होती : नवाब मलिक

भाजपसोबत जाऊन शिवसेना बिघडली होती : नवाब मलिक

मुंबई : शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता. भाजपसोबत जाऊन शिवसेना बिघडली होती असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. पत्रकारांशी बोलताना श्री. नवाब मलिक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून हे सरकार काम करील जनतेला न्याय देईल, जातीधर्मा पलीकडे जाऊन सर्वांसाठी हे सरकार काम करेन. 

श्री. नवाब मलिक पुढे म्हणाले, नेता निवडीसाठी तिन्ही पक्षांची आता बैठक होईल. पुढचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरेच असतील. श्री. शरद पवार यांनी शिवसेनेच्या भाषेत सांगितले आहे की, हा माझा आदेश आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्याला होकार दिला आहे. नेता निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील. महाराष्ट्रातील हे नवे सत्ता समीकरण विरोधक म्हणताहेत हे सरकार सहा महिनेही चालणार नाही पण आम्ही हे सरकार पाच वर्षे काय पंधरा वर्षेही चालवू. 

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयावर भाजपच्या नेत्यांना घोडेबाजार करण्याची संधी नाही हे लक्षात आले. हंगामी अध्यक्ष विश्‍वासदर्शक ठरावासाठी असतील. मतदान इन कॅमेरा होणार नाही. हे स्पष्ट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. लोकशाहीत आम्हीच राहू , नियम पाळणार नाही असे म्हणणाऱ्यांना पद सोडावे लागले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचा पराभव देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. महाराष्ट्राच्या चाणक्‍याने भाजपला त्यांची जागा दाखवली आहे, असेही श्री. नवाब मलिक म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com