वाशी : नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईकांची 25 वर्षापासूनची असणारी एकहाती सत्ता खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधला आहे. नुकतेच ऐरोली स्पोर्टस कॉम्पलेक्समध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या वेळी दुसऱ्या पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देताना विचारविनिमय करून घेण्याचे ठरले होते. मात्र शिवसेनेने गेल्या दोन आठवड्यापासून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेताना विचारविनिमय केलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेने दुसऱ्या पक्षांतील पदाधिकांऱ्याना विचारविनिमय न करता पक्षात प्रवेश देणे, हे नैतिकतेचे नसल्याचे प्रतिक्रिया दिघा येथील प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी कॉग्रेसचे हेमंत खारकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर होऊन आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण रंगू लागले असून पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. महाविकास आघाडीची बैठका सुरू झाल्या असून त्यामध्ये कोणत्या पक्षाला कोणता प्रभाग देणार यासंदर्भात चर्चा झाली आहे. मात्र तरी देखील शिवसेनेकडून भाजपाच्या चार माजी नगरसेवकांना प्रवेश देत पालिकेच्या निवडणुकीत तिकिट देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत जे प्रभाग शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या वाटयाला जाणार आहे, हे ठरलेले असताना दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देणे हे नैतिकतेचे नसल्याची टीका जितेंड आव्हाड यांनी केली आहे. शिवसेनेमध्ये ज्या पध्दतीने भाजपाच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेत आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेचे नवी मुंबई महापालिका निवडणुकीत "एकला चलो रे' करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.