'समृध्दी'च्या गावांत तलाठी बनलेत रिर्पोटर : शेतकरी- प्रशासनात संवाद ब्लॉक

शेतकऱ्यांच्या संसारावर कुऱ्हाड येईल असा कोणताही प्रकल्प नको आहे. समृध्दीला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने सरकारने हट्ट सोडून त्यावर पर्याय शोधावेत- शीतल सांगळे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा परिषद.
'समृध्दी'च्या गावांत तलाठी बनलेत रिर्पोटर : शेतकरी- प्रशासनात संवाद ब्लॉक

नाशिक : मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गाच्या जमिन संपादनाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी आणि शासनातील संवाद 'ब्लॉक' झाल्याने या प्रश्‍नावर पुढे जाण्यात प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे आता संबधीत गावांतील तलाठ्यांना शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे काम सोपवले आहे. हे तलाठी आता 'रिपोर्टर' बनले आहेत.

राजकारण तापल्यावर त्यात प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्यात तरबेज असतो. अशीच स्थिती समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन होणाऱ्या ईगतपूरी आणि सिन्नर तालुक्‍यांत बनली आहे. अगदी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष या महामार्गाच्या विरोधात गेले आहेत. या 49 गावांतील जमिनींचे दर शासनाने नुकते जाहीर केले. त्यात एकरी 40 ते 85 लाख रुपये असा थेट तिप्पट भाव जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध कायम असून त्याची तीव्रता वाढली आहे. शिवडे गावात तर चौसष्ट शेतकऱ्यांनी दडपशाही झाल्यास आत्महत्येची तयारी केल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसही येथे सावधगिरी बाळगत आहेत.

प्रशासन व शेतकरी यांच्यातील संवाद खंडीत झाल्याने तो स्थापित करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा दुवा म्हणून थेट शेतकऱ्यांशी रोजचा संबंध असलेल्या तलाठ्यांवर ही जबाबदारी सोपविली आहे. हे तलाठी रोजच प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी जाऊन संवाद- गप्पा यातून त्यांची भूमिका जाणून घेत आहेत. सायंकाळी त्याची माहिती वरिष्ठांना दिली जाते. त्यामुळे आधी पोलिस, त्यानंतर गुप्तचर यंत्रणा व आता तलाठ्यांना समृध्दीच्या कामाला जुंपले आहे.

समृध्दी महामार्ग हा रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील प्रकल्प आहे. मात्र संपादीत जमिनींचे दर जाहीर करण्याची घोषणा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केली. त्यानंतर हा दर कमी किंवा जास्त अशी प्रतिक्रीया अपेक्षीत होती. कमी असल्यास चर्चेद्वारे तो वाढविण्याचा प्रस्ताव देण्याची रणनिती प्रशासनाने आखली होती. मात्र ती फसली आहे. संघर्ष संमिती याबाबत ठाम आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या (ता.14) या विषयावर मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहेत. शनिवारी (ता.15) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे नाशिकच्या दौऱ्यावर येत असल्याने या विषयावरील राजकारण तापत राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com