वंजारी चळवळीचे केंद्र आता बीडहून नाशिकला येणार? 

राज्यातील वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून यापूर्वी (कै) गोपीनाथ मुंडे तर त्यांच्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र समाजाच्या आरक्षणासाठी नाशिकहून नवी चळवळ सुरु झाल्याने त्याला मुंडेंचे समर्थन की वेगळी चुल यावर संबंधितांनी बोलणे टाळले. याचे नेतृत्वही सामुहीक असल्याचा दावा केल्याने समाजात नवे नेतृत्व उभे करण्याचा तर प्रयत्न नाही ना? असे याकडे पाहिले जात आहे.
वंजारी चळवळीचे केंद्र आता बीडहून नाशिकला येणार? 

नाशिक : राज्य शासनात विविध महत्वाच्या पदांवर असलेल्या वंजारी समाजाला आता वाढीव आरक्षण हवे आहे. त्यासाठी नाशिकच्या शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांनी रणशिंग फुंकले आहे. लवकरच उत्तर महाराष्ट्रातील समाजातील नागीरकांचा मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केले जाईल अशी घोषणा आमदार दराडे यांनी केली आहे. त्यामुळे वंजारी समाजाचे केंद्र आता बीडहून नाशिकला सरकणार काय? याची चर्चा सुरु झाली आहे. 

राज्यातील वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून यापूर्वी (कै) गोपीनाथ मुंडे तर त्यांच्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र समाजाच्या आरक्षणासाठी नाशिकहून नवी चळवळ सुरु झाल्याने त्याला मुंडेंचे समर्थन की वेगळी चुल यावर संबंधितांनी बोलणे टाळले. याचे नेतृत्वही सामुहीक असल्याचा दावा केल्याने समाजात नवे नेतृत्व उभे करण्याचा तर प्रयत्न नाही ना? असे याकडे पाहिले जात आहे.  दराडे यांच्या कुटुंबात नरेंद्र आणि किशोर हे दोघेही आमदार आहेत. एकाच कुटुंबात दोघे आमदार झाल्याने गेले काही दिवस फारसे चर्चेत व सक्रीय नसलेल्या आमदार दराडे यांनी समाजातील विविध घटकीांच मोट बांधत 'क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक आरक्षण कृती समिती' स्थापन केली आहे. समाजाची मोठी शिक्षण संस्थाही नाशिकमध्ये आहे. त्याचे काही पदाधिकारीही यामध्ये सक्रीय झाले. त्यामुळे मंत्री, खासदार, विविध समित्यांवर कार्यरत असलेल्या नेत्यांहून वेगळी भूमिका घेत राज्य सरकारशी संघर्षाची तयारी सुरु झाली. त्यामुळे एरव्ही समाजात प्रत्येक निर्णयासाठी बीडकडे डोळे लावलेल्यांसाठी नाशिक हे समाजाच्या चळवळीचे नवे केंद्र होणार का? याची चर्चा रंगली आहे. 

यासंदर्भात ते म्हणाले, ''राज्यात वंजारी समाज मोठ्या संख्येने आहे. त्याला भटके विमुक्त जमाती (ड) अंतर्गत दोन टक्के आरक्षण आहे. मात्र समाजाची लोकसंख्या सात ते आठ टक्के आहे. त्याचा विचार करता आरक्षण तोकडे आहे. त्यामुळे वाढीव आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर दौरा करून दिशा ठरविली जाईल.''

या वेळी आमदार किशोर दराडे, व्ही. एन. नाईक संस्थेचे माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, अॅड. पी. आर. गिते, हेमंत धात्रक उपस्थित होते. या समितीचे नेतृत्व एका व्यक्तीकडे नसून सामूहीक असेल. राज्यभर दौरा करून पुढील महिन्यात उत्तर महाराष्ट्रात होणाऱ्या मेळाव्यात याबाबतचा निर्णय घेतला जाईल. मार्गदर्शन सर्वांचे घेतले जाईल मात्र नेतृत्व हे सामूहिक असेल, असेही या वेळी सांगण्यात आले. अचानक याबाबतच्या हालचाली सुरु झाल्याने त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

हा समाजाचा प्रश्‍न आहे. नेतृत्व कोणा एका व्यक्तीकडे नसेल. ते सामुहिक असेल - नरेंद्र दराडे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com