खासदार दिल्लीला; नियोजन बैठक नाशिकला 

खासदार दिल्लीला; नियोजन बैठक नाशिकला 

जिल्हा नियोजन मंडळाची तिमाही बैठक पालकमंत्री गिरीष महाजन यांना सवड नसल्याने चक्क सहा महिन्यांनी होते आहे. यामध्ये शासनाच्या वर्षभराच्या निधीचा विनियोगाचा विषय आहे. गंमत म्हणजे विधीमंडळ, संसदेच्या अधिवेशनाच्या कालावधीत ही बैठक घेऊ नये हे संकेतही गुंडाळून ठेवले. त्यामुळे तिन्ही भाजप, शिवसेनेचे तिन्ही खासदार बैठकीस मुकणार असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाची तिमाही बैठक पालकमंत्री गिरीष महाजन यांना सवड नसल्याने चक्क सहा महिन्यांनी होते आहे. यामध्ये शासनाच्या वर्षभराच्या निधीचा विनियोगाचा विषय आहे. गंमत म्हणजे विधीमंडळ, संसदेच्या अधिवेशनाच्या कालावधीत ही बैठक घेऊ नये हे संकेतही गुंडाळून ठेवले. त्यामुळे तिन्ही भाजप, शिवसेनेचे तिन्ही खासदार बैठकीस मुकणार असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन व विकास मंडळाची बैठक उद्या (ता.19) होत आहे. दर तीन महिन्यांनी होणारी ही बैठक तब्बल सहा महिन्यांनी होत आहे. संसदेचे अधिवेशन असल्याने त्याला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे तिघेही संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने ते उपस्थित राहू शकणार नाही. 

ही बैठक देखील दोन दिवसांपूर्वी अचानक ठरल्याने अनेकांना त्याचे निमंत्रण सोमवारी मिळाले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांना दूरध्वनीवरुन त्याबाबत निरोप दिल्यावर अधिवेशन काळात बैठक कशी घेतली? या प्रश्‍नावर अधिकारी मात्र गडबडले. खासदार गोडसे यांनीही असाच प्रश्‍न विचारल्यावर "प्रयत्न करा. बैठीस उपस्थितस रहा. शेतकरी आंदोलनामुळे बैठकीस विलंब झाला' असा खुलासा वजा विनंती अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे नाराजी मात्र दूर झाली नाही. या बैठकीत वर्षभरातील नियोजन कसे करणार? कारण चार महिन्यांचा कालावधी संपला आहे अशी जिल्हा परिषद सदस्यांची नाराजी आहे. 

पालकमंत्री गिरीष महाजन नाशिकला केव्हा येतील याची सगळ्यांनाच चातकासारखी प्रतिक्षा असते. विशेषतः प्रशासकीय बैठकांचे नियोजन त्यांच्या दौऱ्यावर अवलंबून असल्याने जिल्हा प्रशासनाकडून त्यांना त्याबाबत स्मरण दिले जाते. मात्र ते पालक जरी नाशिकचे असले तरी त्यांचे गृहजिल्हा जळगावचे प्रेम व ओढ अजिबात कमी झालेली नाही. प्रत्येक बैठकीस उशीरा येत असल्याने मध्यंतरी शासनाने महाजनांना हेलीकॉप्टर उपलब्ध करुन दिले होते. हेलीकॉप्टरची सुविधा उपलब्ध झाल्यावर तरी ते नियमीत दौरे करतील अशी अपेक्षा होती. मात्र कार्यकर्त्यांची ती अपेक्षाही पूर्ण होऊ न शकल्याने त्यांच्या समर्थकांतच नाराजी असते. आती वरिष्ठ लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली. त्याचे खापर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांवर फुटते की काय या शक्‍यतेने अधिकाऱ्यांना मात्र घाम फुटला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com