नारायण राणे भाजपसोबतच राहणार : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात मंत्रीपदाचं आश्वासन

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये जाणार या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राणे यांच्याशी चर्चा करुन त्यांचं मन वळवलं. राणे यांचा स्वाभिमानी पक्ष येत्या लोकसभेच्या निवडणुकीत तीन जागा लढवणार आहे.
नारायण राणे भाजपसोबतच राहणार : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात मंत्रीपदाचं आश्वासन

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये जाणार या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राणे यांच्याशी चर्चा करुन त्यांचं मन वळवलं. राणे यांचा स्वाभिमानी पक्ष येत्या लोकसभेच्या निवडणुकीत तीन जागा लढवणार आहे.

नारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार असे संकेत काँग्रेसनेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर येथे नेवाशात पत्रकारांशी बोलताना दिले होते. राणे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. येत्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली तर राणे भाजपमध्ये परततील, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आज मुख्यमंत्रांनी राणे यांची चर्चा करुन त्यांचे मन वळविले. नव्या फाॅर्म्युलानुसार राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला लोकसभा निवडणुकीत तीन जागा देण्यात येणार असून लोकसभा निवडणुकीनंतर राणे यांना केंद्रात मंत्रीपद देण्याचंही कबूल करण्यात आले आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राणे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार का याबाबतही चर्चा सुरु झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com