मुख्यमंत्र्यांनी चर्चेला वेळ द्यावा मी तयार आहे : नाना पटोले 

सरकार दबावतंत्राचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मी बोलत असल्याने माझ्यावर गुन्हे दाखल केल्या जात आहेत. विकास केल्याची वातावरण निर्मीती केली जात आहे. शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्‍न कायम आहेत. गरिबांचे प्रश्‍न आम्ही सोडवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. माझ्या मते या देशात दोनच गरीब आहेत, एक अदानी तर दुसरे अंबानी - नाना पटोले
Devendra Phadanavis - Nana Patole
Devendra Phadanavis - Nana Patole

यवतमाळ : आम्हीच राज्याचा विकास केला, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. आम्ही या पोकळ घोषणेचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे चॅलेंज दिले होते. हे चॅलेंज मी स्वीकारले असून कुठेही चर्चेसाठी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, असे प्रतिआवाहन माजी खासदार तथा कॉंग्रेसचे राज्य प्रचार समितीप्रमुख नाना पटोले यांनी दिले. 

ते म्हणाले की, सरकार दबावतंत्राचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मी बोलत असल्याने माझ्यावर गुन्हे दाखल केल्या जात आहेत. विकास केल्याची वातावरण निर्मीती केली जात आहे. शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्‍न कायम आहेत. गरिबांचे प्रश्‍न आम्ही सोडवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. माझ्या मते या देशात दोनच गरीब आहेत, एक अदानी तर दुसरे अंबानी, असा टोलाही पटोलेंनी हाणला. पीक विमा काढण्याचे काम रिलायन्सला दिले गेले. शिक्षक भरतीचे 'पवित्र' पोर्टल कुणाचे आहे, हे राज्य शासनाने स्पष्ट करावे, असे आवाहन पटोले यांनी केले. 

आघाडी सरकारच्या काळात श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपची होती. पाच वर्षांत राज्यावरील कर्ज वाढले आहे. त्यामुळे आता पारदर्शी कारभार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते काम केले, किती खर्च झाला, यांची श्‍वेतपतिका काढावी, अशी मागणी पटोलेंनी केली. यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार यशोमती ठाकूर, माजी खासदार राजीव सातव, आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. वझाहत मिर्झा, बाबासाहेब गाडे पाटील, जीवन पाटील, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, नगरसेविका वैशाली सवाई आदी उपस्थित होत्या. 

भाजप सध्या भ्रष्टाचाऱ्यांची मेगाभरती घेत आहे. त्यांना बेरोजगार युवकांच्या प्रश्‍नांशी काही देणेघेणे नाही. पाच वर्षांत शेतकऱ्यांची चेष्टा सरकारने केली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सत्तेवर येईल तर विरोधी पक्षात शिवसेना असेल, भाजप कुठेही दिसणार नाही, असा दावाही पटोले यटांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com