‘ही’ साधी गोष्ट समजायला सहा महिने लागले, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा...

येवढी साधी गोष्ट समजण्यासाठी मुख्यमंत्र्यांना येवढा प्रदीर्घ कालावधी लागला, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. विधानसभेत वाझे हे ओसामा बिन लादेन आहे का, असे म्हणत त्याचा बचाव करण्यात आला होता.
Sudhir Mungantiwar - Uddhav Thackeray.
Sudhir Mungantiwar - Uddhav Thackeray.

नागपूर : ॲंटीलिया स्फोटक प्रकरणात एक-एक करून ट्वीस्ट येत आहेत. यातील पोलिस अधिकारी सचिन वाझे Police Officer Sachin Waze हा मुख्यमंत्र्यांची The Chief Minister दिशाभूल करीत आहे. चौकशीत या गोष्टीचा खुलासा झाला आहे आणि ही गोष्ट समजायला मुख्यमंत्र्यांना तब्बल सहा महिने लागले, असे भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार BJP Leader MLA Sudhir Mungantiwar म्हणाले. 

येवढी साधी गोष्ट समजण्यासाठी मुख्यमंत्र्यांना येवढा प्रदीर्घ कालावधी लागला, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. विधानसभेत वाझे हे ओसामा बिन लादेन आहे का, असे म्हणत त्याचा बचाव करण्यात आला होता. अशी आठवण त्यांनी करून दिली. राज्यातील काही अधिकारी व शिवसेनेतीलच काही नेते आजही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. ही दिशाभूल मुख्यमंत्र्यांना समजेल, त्यावेळेस मात्र फार उशीर झालेला असेल आणि महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असेल, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. ९ मार्चला अधिवेशनात आम्ही वारंवार मागणी करीत होतो. मुख्यमंत्री महोदय याठिकाणी मोठं षड्यंत्र सुरू आहे, असं सतत सांगत होतो. पण मुख्यमंत्री काही ऐकायला तयार नव्हते, असेही ते म्हणाले. 

अँटिलिया प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA करीत आहे. या प्रकरणात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदविला आहे. या जबाबात महत्वपूर्ण बाबींचा उलगडा झाला आहे. व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देण्यात आल्याचे आता तपासात समोर आले आहे. 

मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर ५ मार्चला या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावले होते. यावेळी ठाकरे यांनी  या घटनेमागे काही अतिरेक्यांचा हात आहे का? असे विचारले असता सचिन वाझे यांनी सांगितले की, अँटिलिया घटनेमागे कोणतेही दहशतवादी षड्यंत्र नाही. याशिवाय, मनसुखचा मृत्यू आत्महत्या आहे, असे वाटते. पण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो, ते पाहिले पाहिजे.

मनसुख हिरेन ज्या दिवशी बेपत्ता झाला, त्या दिवशी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह याच्या केबिनमध्ये माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे उपस्थित होते. वाझेनेच मनसुख हिरेन बेपत्ता झाल्याची आणि त्याचा मृतदेह रेतीबंदर येथे आढळल्याची बातमी प्रथम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. अधिकारी आयुक्तांच्या केबिनमध्ये पोहचण्यापूर्वीच वाझे थेट आयुक्तांना ही माहिती सांगण्यासाठी गेला. त्यावेळी निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्माही तेथे उपस्थित होते. या माहितीनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस आयुक्तांच्या भेटीला गेले असता  प्रदीप शर्मा हे आयुक्तांच्या केबिनमधून बाहेर पडत होते.

''आम्ही दहशतवाद्यांचा कट नाकारू शकत नाही. तसेच मनसुखच्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टममध्येच स्पष्ट होईल. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे आणि जयजीत सिंह यांना या प्रकरणाच्या अपडेट्सची माहिती देण्यास सांगितले. सुमारे ४० मिनिटांच्या बैठकीनंतर प्रत्येक जण निघून गेला. त्यानंतर वाझे यांनी मला सांगितले की त्यांना सीपींना कळवायचे आहे, यानंतर वाझे सुमारे अर्धा तास बोलले आणि नंतर प्रत्येक जण आपापल्या घरी गेले,'' असे तत्कालीन एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी सांगितले. या सर्व घटनाक्रमावरून सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com