नागपूर : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Animal Hunbandery Minister Sunil Kedar यांनी शनिवारी काटोलमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख former MLA of Katol Ashish Deshmukh यांना खुर्चीवरून उठवून दिले. त्यानंतर संतापलेल्या देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केदारांना मंत्रिपदावरून बरखास्त करण्याची मागणी केली. हा वाद दिल्लीत पोहोचला. त्यानंतर केदारांनी दिल्लीत जाऊन आपली बाजू सांभाळून घेतली. त्यानंतर काल रात्री देशमुखही दिल्लीला रवाना झाले आहेत.
राज्याचे पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप करून माजी आमदार आशिष देशमुख यांनी खळबळ उडवून दिली. दीडशे कोटी रुपयांचा अपहार केल्याने केदारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या लेटरबॉम्बने सारेच हादरले आहेत. काँग्रेसकडून घरचा अहेर मिळाल्याने केदारांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. त्यांनी तातडीने दिल्ली गाठून सारवासारव केल्याचे समजते. हे समजताच देशमुख यांनी दिल्लीची तयार केली आहे. सोनिया गांधी, राजीव गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील, महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना त्यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांना या नेत्यांनी भेटीच वेळ दिली की नाही, हे समजू शकले नाही. मात्र तातडीने ते दिल्लीला रवाना झाल्याने निश्चितच कोणीतरी भेटणार असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर जिल्ह्यात केदार-देशमुख यांच्यातील वाद जुनाच आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजीत देशमुख सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये युद्ध सुरू आहे. सुरुवातीला सावनेरमधून देशमुखांनी केदारांना एकदा पराभूत केले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत केदारांनी पराभवाचे उट्टे काढले. आशिष देशमुख भाजपचे उमेदवार असताना सावनेरमध्ये त्यांची केदार यांच्याशी जोरदार लढत झाली होती. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्ते आपसात भिडले होते. त्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या लढतीत आशिष देशमुखांचा निसटता पराभव झाला होता.
ही बातमी पण वाचा ः मनसेची राष्ट्रीय स्तरावरील हिंद मजदूर सभेत एन्ट्री, कक्षा विस्तारणार...
देशमुख काटोलमध्ये गेल्याने हा वाद क्षमला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी काटोलमध्ये झालेल्या एका आढावा बैठकीत केदारांनी बैठकीतून उठवून अपमान केल्याने देशमुख चांगलेच संतापले आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचा लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे. आता दिल्लीतील काँग्रेसचे शीर्षस्थ नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केदारांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही. देशमुख यांनी आपण दिल्ली जात असल्याचे सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.