यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांचे मूळ गाव असलेल्या गहूली येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत नाईक गटाने विरोधी गटाला धूळ चारली.
पुसद तालुक्यातील गहूली हे वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांचे मूळ गाव. एक हजार लोकसंख्येच्या या गावात आजवर अविरोध निवडणुकीचा पॅटर्न राबविण्यात आला. सात सदस्यीय ही ग्रामपंचायत आहे. यावेळी देखील सर्वसंमतीने सदस्यांची निवड करण्यात येणार होती. त्यानुसार सहा सदस्यांची निवड देखील झाली. मात्र एका जागेसाठी घोडे अडले. या जागेसाठी विलास जगनसिंग आडे व अशोक चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली. गावातील 630 पैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार विलास आडे यांना 308 तर विरोधी उमेदवाराला अवघी 121 मते मिळाली. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या गावात पहिल्यांदाच निवडणूक झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते.
वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या पुण्याईमुळे हा विजय झाला. विरोधकांच्या मनसुब्यांवर यामुळे पाणी फेरले गेले आहे. भविष्यात अशा प्रकारची कृती करण्यासाठी या अनुभवानंतर ते धजावणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. गावात सात सदस्यांची ग्रामपंचायत आहे त्यांपैकी सहा जागांवर तर विरोधकांना उमेदवार देखील मिळाले नाहीत. त्यावरूनच त्यांनी चिंतन करायला हवे होते. मात्र त्यानंतरही त्यांनी एक उमेदवार उभा केला. त्याला देखील जनतेने जागा दाखवून दिली आहे.
- निलय नाईक, आमदार, भाजप.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.