नागपुरात कॉंग्रेस अजून जिवंत आहे!

मोदी लाट आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला साडेचार लाख मते मिळाली. तसेच विधानसभा मतदाररसंघातही मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यावरून कॉंग्रेसची पाळेमुळे अद्यापही जिवंत असल्याचे स्पष्ट होते.
नागपुरात कॉंग्रेस अजून जिवंत आहे!

नागपूर : मोदी लाट आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला साडेचार लाख मते मिळाली. तसेच विधानसभा मतदाररसंघातही मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यावरून कॉंग्रेसची पाळेमुळे अद्यापही जिवंत असल्याचे स्पष्ट होते.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी यांनी सलग तीन निवडणुका जिंकणाऱ्या विलास मुत्तेमवार यांच्या विजयाची मालिका खंडित केली. त्यांनी सुमारे पावणे तीन लाखांचे मताधिक्‍य घेतले. मोदी लाट आणि कॉंग्रेसमधील अंतर्गत भांडणाचा त्यांना चांगलाच फायदा झाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व सहाच्या सहा उमेदवार पराभूत झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले उत्तरचे उमेदवार नितीन राऊत यांचाही टिकाव लागला नाही.

मतदारसंघ बदलवून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी नशिब अजमावले. मात्र काहीच फायदा झाला नाही. उलट दक्षिण आणि पूर्व नागपूर दोन्ही ठिकाणी नुकसान झाले. विकास ठाकरे यांनाच नव्हे तर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही पश्‍चिमधून विजयाची मोठी आशा होती. तीही फोल ठरली. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. दीडशे सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत फक्त 18 नगरसेवक निवडून आले.

पाच वर्षांच्या कार्यकाळात नितीन गडकरी यांनी कोट्यवधीची कामे शहरात केली. नागपूरचा आमदार मुख्यमंत्री झाला. देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले. नागपूरचे रखडलेले प्रकल्प, अडलेल्या फाईल पटाफट क्‍लिअर केल्या. या झंझावात कॉंग्रेसचे अस्तित्व शिल्लक राहाणार नाही, अशी भीती व्यक्त केल्या जात होती.

महापालिकेच्या निवडणुकीपासूनच कॉंग्रेसच्या नेत्यांचे वाद विकोपाला गेले होते. प्रदेशाध्यक्षांवर शाई व अंडी फेकून त्यांनी रोषही व्यक्त केला होता. कोणीच कोणाचे ऐकत नसल्याने नाना पटोले यांना भंडारा येथून आयात करावे लागले. त्यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रचाराचा नुसता देखावा केला. सर्वच बाबी विरोधात असतानाही कॉंग्रेसला सुमारे चार लाख 43
हजार मते मिळाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे एक लाखांनी मताधिक्‍यातसुद्धा भर पडली. ही बाब कॉंग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी सुखावणारी आहे. कॉंग्रेस संपली नाही आणि कोणी संपवूसुद्ध शकत नाही हे यातून दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com