शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार महान चूक ठरेल : एन. डी. पाटील

ज्यांनी हा प्रश्‍न निर्माण केला. त्यांच्याही मनात शिवाजी महाराजांविषयी आदर आहे, तसा आम्हालाही आहे. -जयसिंगराव पवार
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार महान चूक ठरेल : एन. डी. पाटील

कोल्हापूर : शिवाजी विद्यापाठीची स्थापना झाली. त्याचवेळी त्याला नाव देताना सर्व बाजूंचा विचार करून हे नाव ठरवण्यात आले होते. राज्याचे पहिले मुख्यंमत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला होता, आता विद्यापीठाचा नामविस्तार करणे म्हणजे ती महान चूक ठरेल, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आज दिला.

पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापाठीचा नामविस्तार करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आज दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या नामकरणाचा इतिहासच सर्वांसमोर मांडला. याबाबत आमची भुमिका स्वच्छ आहे, हा वाद इथेच मिटला तर याच्याइतके समाधान नाही. ज्यांनी प्रस्ताव सुचवला, ज्यांनी पाठपुरावा केला, त्यांना एक विनंती आहे की त्यांनी हा प्रश्‍न वादाच्या भोवऱ्यात आणू नये, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी यावेळी केले.

डॉ. पाटील म्हणाले," या प्रश्‍नावर यापुर्वी चर्चा झालीच नाही असे नाही. जाहीररित्या यावर चर्चा झाली. विद्यापीठ स्थापन करायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यासाठी समिती नेमली, त्यात मान्यवर शिक्षण तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली नेमली. त्या समितीच्या अहवालानुसार विद्यापीठाचे नाव दिले गेले. साहजिकच त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावे विद्यापीठ होतंय म्हटल्यावर त्यात छत्रपती शिवाजी असावे अशा प्रतिक्रिया आल्या. त्याचेही जाहीर उत्तर त्या समितीने दिले. सरकारनेही आपले म्हणणे दिले. जो युक्तीवाद आम्ही आज करतोय तो त्यावेळीही झाला आहे. पुर्व विचारांती हा निर्णय झालेला आहे. यावर लोकांनी फारसा वाद घालू नये.'

ते म्हणाले," विद्यापीठाचा नामविस्तार झाला तर ज्यांच्या नावे विद्यापीठ आहे. त्यांचेच नाव गायब होते. मुख्यमंत्री असतील किंवा खासदार संभाजीराजे यांचा आदर ठेवून मी बोलतो, त्यांची विचारसरणी जी आहे, त्याला विरोध असण्याचा संबंध नाही. पण नाव देताना जी कारणे दिली होती. ती आजही आहेत. विद्यापीठ स्थापन करायचा निर्णय ज्यावेळी निश्‍चित झाला, त्यावेळी काही लोकांना यशवंतराव चव्हाण यांनी काही लोकांना बोलवून घेतले, त्यात मी सुध्दा होतो. त्या बैठकीतच स्वर्गीय चव्हाण यांनीच या प्रश्‍नावर वाद न करण्याचे आवाहन केले होते. देशात ज्या महान व्यक्तींच्या नावे विद्यापीठ किंवा संस्था आहेत. त्याचे संक्षिप्तीकरण झालेले आहे. त्यातून मूळ नावच गायब झाले आहे. तसा प्रकार शिवाजी विद्यापीठाच्या बाबतीत होऊ नये, ही आमची भुमिका आहे. म्हणून विद्यापीठाचा नामविस्तार करू नये, या भुमिकेवर आम्ही ठाम आहोत.'

प्रा. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले,"ज्यांनी हा प्रश्‍न निर्माण केला. त्यांच्याही मनात शिवाजी महाराजांविषयी आदर आहे, तसा आम्हालाही आहे. कितीतरी उदाहरणे देता येतील, त्यात संक्षिप्तीकरणामुळे नाव गायब झाले आहे. दिग्गज लोकांनी एकत्र येऊन हे नाव दिले आहे. स्वर्गीय चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या दिग्गजांनी शिवाजी विद्यापीठच नाव ठेवले. विश्‍वविद्यालयही न करता विद्यापीठ असेच नाव ठेवले. हेच नाव कायम रहावे.'  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com