मुस्लिम आरक्षणाचा विषय फडणवीस यांनी विनाकारण लांबविला : नवाब मलिक 

मुस्लिम आरक्षणाचा विषय फडणवीस यांनी विनाकारण लांबविला : नवाब मलिक 

भिवंडी : भाजपला भांडण लावल्याशिवाय राजकारण करता येत नाही. त्यामुळे देशात आणि राज्यातील वातावरण गढूळ होत आहे अशी टीका अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 

भिवंडीत रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात बेरोजगारांची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने महाविकास आघाडी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पात रोजगारासाठी योजना जाहीर करेल, तसेच मुस्लिम समाजाला आरक्षण देणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. 

शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम आरक्षणाबाबत भाजप सरकारच्या काळात उच्च न्यायालयाने शिक्षण क्षेत्रातील पाच टक्के मुस्लिम आरक्षण मान्य केले. त्यानंतर देखिल कायदेशीर सल्ला घेतो म्हणून भाजप सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण मुस्लिम अरक्षणाचा विषय लांबत ठेवला. मुस्लिम आरक्षणाबाबत भाजप नेते विनाकारण लोकांची दिशाभूल करीत आहेत. 

शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम आरक्षणामुळे राज्यातील एससी, एसटी, मराठा, ओबीसी यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नसून उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातील पाच टक्के मुस्लिम आरक्षण महाआघाडी सरकार कायदेशीर मार्गाने लागू करेल, असे आश्वासन याप्रसंगी नवाब मलिक यांनी दिले. 

यावेळी मंत्री नवाब मलिक, महापौर प्रतिभा पाटील, उपायुक्त दिपक कुरळेकर, विजय जाधव, बी. डी. जाधव, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य डी. एल. अहिरे, विनोद भानुशाली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांच्यासह युवक-युवती, विद्यार्थी उपस्थित होते. 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com