महापुरात तीन दिवस एकही राज्यकर्ता फिरकला नाही - धनंजय मुंडे

महापुरात तीन दिवस एकही राज्यकर्ता फिरकला नाही - धनंजय मुंडे

कऱ्हाड : सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यात महापुराने 25 ते 30 लोक गेले. बोट मिळाली नाही म्हणुन अनेकांना आपले जीवन संपवावे लागले. अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांपैकी एकही माणुस पुरस्थितीची पाहणी करायला आला नाही, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केला. 

तांबवे (ता.कऱ्हाड) येथील पुरस्थितीच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. किल्लारीत भुकंप झाला त्यावेळी पहाटे साडेतीन वाजता शरद पवार हे तेथे पोचले होते. त्याची आठवण ठेवून 25 वर्षानंतर शरद पवारांचे आभार मानायला किल्लारीतील भुकंपग्रस्तांनी सत्कार केला असे सांगून मुंडे म्हणाले, एकीकडे असे असताना सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यात महापुर असताना तीन दिवस एकही राज्यकर्ता तिथे फिरकला नाही. पुराने अनेक घरे पडली आहेत, जनावरे वाहुन गेली आहेत, अनेकांना जीव गमावावा लागला आहे, अनेकजण स्थलांतरीत झाले आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी खुद्द शरद पवार हे स्वतः फिरत आहेत. शासन पातळीवर मदत मिळवुन देवुच मात्र लोकप्रतिनिधी, पक्षाच्या माध्यमातुनही पुरग्रस्तांना मदत देण्यात येईल. आम्ही राजकारण न करता, सरकारने मदत करो किंवा न करो, आम्ही मात्र जनतेला मदत करुन त्यांचे अश्रू पुसू अशी ग्वाही त्यांनी दिली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com