
मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लगेच राऊत यांनी जामिनीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांच्यावर त्यांची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत (ED Office)उत्तर देण्याचे निर्देशच विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली गेली असली तरी, 16 सप्टेंबरला ईडीकडून काय उत्तर दिले जाते? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
संजय राऊत यांनी गुरुवारी केलेल्या अर्जावर सुनावणी झाली. त्यानंतर त्यांच्या जामीनाबाबत ईडी कार्यालयाने 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यावे असे निर्देश न्यायालयाने ईडी कार्यालयाला दिले आहेत. आता ईडी कार्यालयाकडून काय उत्तर मिळते त्यावरच संजय राऊत 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार की त्यापूर्वी न्यायालय काही निर्णय घेणार याकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पत्राचाळ हा म्हाडाचा भूखंड आहे. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडा व भाडेकरुंची दिशाभूल करुन यातील अनेक भाग हा खासगी कंत्राटदारांना दिला. तसेच त्यातील 25 टक्के शेअर्स हे एचडीआयएलला विकले. या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.