Abdul Sattar यांची कोंडी ; ठाकरेंमुळे मिळालेले मंत्रीपद शिंदे सरकारमध्ये गमावणार

Abdul Sattar | मंत्रीमंडळ विस्तारासाठी सध्या जागा कमी आणि इच्छुक जास्त असे विरोधाभासी चित्र शिंदे सरकारमध्ये आहे.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (eknath shinde)यांच्या गटात गेलेले आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar)आज दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांचा मंत्रीमंडळात सामावेश होणार की नाही, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चॅलेंज सत्तारांनी स्वीकारलं आहे. राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे विधान त्यांनी केलं आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्रीपद सोडून शिंदे गटात सामील झालेल्या सत्तारांना मंत्रीपद मिळणार का, याबाबत सध्या शंका उपस्थित करण्यात येत आहे. कारण दिल्लीमधून भाजपच्या गोटातून एक फॅार्म्युला समोर आल्याने सत्तारांच्या मंत्रीपदाची विकेट जाणार असल्याचे समजते. सत्तारांची ही विकेट एका फॉर्म्युल्यामुळे जाणार आहे.

ठाकरे सरकारमध्ये मंत्री असतानाही बंड करुन शिंदे गटात सत्तार सामील झालेले आहेत. तर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यामुळे ते मंत्रीपदाचे दावेदार आहेत. औरंगाबादमध्ये कुणाला हरवायचे यामध्ये सत्तार नेहमीच अग्रेसर असतात, त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणार असा विश्वास त्यांना समर्थकांना आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात संधी मिळावी, म्हणून अनेक आमदारांनी मुंबई आणि दिल्लीचे दौरे सुरु केले आहेत. यामध्ये सत्तारांच्या मंत्रीपदाची चर्चा सगळ्यात जास्त होत आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी सध्या जागा कमी आणि इच्छुक जास्त असे विरोधाभासी चित्र शिंदे सरकारमध्ये आहे.

अनेकांचे पत्ते कापण्यासाठी वेगवगळे फॅार्म्युले तयार केले जात आहेत, अशातच एक फॅार्म्युला समोर येत आहे. मुस्लिमांशिवाय मंत्रीमंडळ असा हा फॅार्म्युला आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, त्या ठिकाणी मुस्लिम मंत्री नाही , याला फक्त उत्तरप्रदेश आणि बिहारचा अपवाद आहे.

Abdul Sattar
Arjun Khotkar : आज निर्णय जाहीर केला तर काही लोकांना रात्रभर झोप लागणार नाही !

सध्या भाजपमध्ये एकही मुस्लिम खासदार नाही. या फॅार्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. याची कुणकुण लागताच सत्तारांनी शिंदेचा सिल्लोड दौऱ्यांची तयारी सोडून थेट दिल्ली गाठल्याची चर्चा आहे. पण खरंच सत्ताराची विकेट गेली आहे का हे मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर स्पष्ट होईल. या फॅार्म्युल्यामुळे सत्तारांचा पत्ता कट करणं हे तसे शक्य नाही, कारण औरंगाबादच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचाराला बगल दिली म्हणून आपण बंड केले असल्याचे सत्तार यांनी म्हटलं आहे. यामुळे काँग्रेमधून शिवसेनेत आलेले सत्तार हिंदुत्वादी कसे असा प्रश्न विचारण्यात येत आहे. हाच प्रश्न आता मंत्रीमंडळामध्ये कळीचा बनल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com