शिवसेनेत प्रत्येकवेळी विश्वासघाताचं राजकारण का झालं ? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं....

Uddhav Thackeray news| Shivsena| शिवसेनेच्या स्थापनेपासून अनेकदा बंडखोरी झाली, पण यावेळी जी बंडखोरी झाली तिने अक्षरश: शिवसेना हादरुन गेली आहे.
Uddhav Thackeray news| Shivsena|
Uddhav Thackeray news| Shivsena|

मुंबई : राज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेप पडलेल्या शिंदे गटाने भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. भाजपाचं पाठबळ असलेला शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट असा संघर्ष, आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहे. अशात पहिल्यांदाच शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमधून बंडखोरीसंदर्भात भाष्य केलं आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून अनेकदा बंडखोरी झाली, पण यावेळी जी बंडखोरी झाली तिने अक्षरश: शिवसेना हादरुन गेली आहे. या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली.

“५६ वर्षात अनेकदा शिवसेना संपवण्याचे प्रयत्न झाले. पण भाजपाला शिवसेना का संपवायची आहे असं आपल्याला वाटतं का?” असा सवाल राऊत यांनी विचारला. “गेल्या ५६ वर्षां शिवसेना संपवायचे अनेक प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळी शिवसेना तितक्याच जोमाने आणि तेजाने उभी राहिली. पण आता ते जे काही करत आहे ते सर्व करण्यामागे त्यांना शिवसेना संपवायची आहे. आता त्यांनी जी तोडफोड केली आहे, ती करुनही त्यांचं समाधान होत नाही म्हणून त्यांना शिवसेना संपवायची आहे. तुमच्या आणि भाजपाच्या हिंदुत्वात फरक काय आहे, हे विाचारणाऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की, त्यांना हिंदूत्त्वात भागीदार नको आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्त्व मजबूत होण्यासाठी, हिंदूत्त्वासाठी राजकारण केलं. पण ते राजकारण करण्यासाठी हिंदूत्त्व वापरत आहेत. हा त्यांच्या आणि आमच्या हिंदूत्त्वातला फरक आहे.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ठरलं होतं, तेव्हाच जर हे केलं असतं तर सन्मानानं झालं असतं. पण भाजपला ठाकरे-शिवसेना वेगळी करायची आहे. भाजपचा शिवसेना संपवण्याचा कट आहे, असा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना तळपती तलवार आहे. संघर्षासाठी शिवसेनेचा जन्म झाला. आताही बंडखोरांना वापरुन त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना आणि संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. विश्वास ठेवला त्यांनीच घात केला, पण आता तुम्हाला विश्वासघाताचा शिक्का पुसता येणार नाही. अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

महाविकास आघाडीमध्ये तुम्ही मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने हिंदुत्व संकटात आलं ?” असं विचारलं असता त्यावर उद्धव यांनी “हिंदुत्व संकटात आलं म्हणजे नेमकं काय झालं?” असा प्रतिप्रश्न विचारला. मी मुख्यमंत्रीपदावर असताना एखादा प्रसंग किंवा गोष्ट किंवा घेतलेला निर्णय दाखवा की ज्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं. एक निर्णय दाखवा, ज्यामुळे हिंदूत्व धोक्यात आलं.” असं म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com