कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक : काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली!

भाजपाने ही फक्त निवडणूक गमावली पण शिवसेनेने मतदार व मतदारसंघ दोन्ही गमावले
Keshav Upadhye
Keshav Upadhyesarkarnama

पुणे : कोल्हापूर (kolhapur)उत्तर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव (Jayshree Jadhav)यांचा विजय झाला. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye)यांनी जाधव यांचे अभिनंदन केले आहे. केशव उपाध्ये यांनी या निकालावर भाष्य केलं आहे. उपाध्ये यांनी या निकालावरुन शिवसेनेला डिवचलं आहे. (kolhapur north by election news updates)

''काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली. भाजपाने ही फक्त निवडणूक गमावली पण शिवसेनेने मतदार व मतदारसंघ दोन्ही गमावले,'' असा टोला उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला आहे.

''महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली तरी जवळपास ७७ हजार मते मिळवली. परंतु मतांचे गणित पाहायला गेले तर २०१४ मध्ये शिवसेनेला ६९ हजार आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा मिळून ७५ हजार मते पडली होती. तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४७ हजार, राष्ट्रवादीला १० हजार मते पडली होती. तर २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ९१ हजार मते मिळाली होती. मग कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचं उघडपणे दिसत आहे,'' असे उपाध्य यांनी टि्वट केलं आहे.

Keshav Upadhye
राज ठाकरेंना शह देण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात ; राऊतांकडून मोठी घोषणा

''शिवसेनेची हक्काची ४० ते ६० हजार मतदान असताना तिन्ही पक्षांची मिळून ९६ हजार मते आहेत. तर भाजपाची एकट्याची ७७ हजार मते आहेत. याचा अर्थ शिवसेनेच्या मतांमध्ये केवळ फूट नाही तर हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारलं आहे. आणि हो, या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ईव्हीएम वरील विश्वास वाढेल ही अपेक्षा आहे,'' असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

Keshav Upadhye
'हिमालयात जाईन' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांचे पुन्हा चॅलेंज ; मी अजून लढलोच नाही..

''कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. काही वेळापूर्वीच आम्ही त्याचं विश्लेषण करण्याची सुरूवात केली आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता मात्र जनतेने जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे,'' असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने भाजपला पराभूत केले आहे.

Keshav Upadhye
कोल्हापुरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवले ; संजय राऊतांचा टोला

कॉंग्रेसचे नेते सचिव सावंत यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ''काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या तमाम कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे. बिलोली देगलूर निवडणुकीनंतर मविआ सरकारच्या पाठीशी जनता आहे हे पुन्हा दिसले. भाजपाच्या दमनशाही व इडीवादाचा हा पराभव आहे. धर्मांधता आणि भाजपाच्या नेत्यांचे गलिच्छ राजकारण जनतेने नाकारले,'' असे टि्वट करुन सचिन सावंत यांनी भाजपला सुनावलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com