Uddhav Thackeray Jalgaon Sabha : टरबुजाचा उल्लेख करून ठाकरेंनी कोणाला डिवचलं?

Uddhav Thackeray News : जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्यावरून राज्यभरात रान पेटलेले असताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे.
Uddhav Thackeray News :
Uddhav Thackeray News : Sarkarnama

Jalgaon Political News : जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्यावरून राज्यभरात रान पेटलेले असताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. जळगावात आयोजित सभेत त्यांनी टरबुजा शब्दांवरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे या शब्दावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, " पोलिस काही राक्षस नाहीत, याच पोलिसांनी कोरोना महामारीच्या काळात लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. शांततेत चाललेल्या आंदोलनात पोलिस हल्ला करतीलच कसा, पण जालन्यात पोलिस आले काय आणि लाठीहल्ला झाला काय, हे म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे जालना हत्याकांड झाले.

Uddhav Thackeray News :
Uddhav Thackeray Rally : खानदेशात धडाडणार 'ठाकरी तोफ' ; कुणाकुणाचा घेणार समाचार ?

पण ही परिस्थिती उद्भलीच कशी, इथे दुसराच कोणीतरी उपटलेला आहे. हा माणूस मला माहिती नाही, पण सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी समोर बसलेल्या उपस्थितांनाच सवाल केला, तुम्ही काय म्हणालात, टरबुजासारखा होता का तो. मी असा टरबुजासारखा माणूस पाहिलेला नाही, पण मी बघतो कोण आहे असा टरबुजासारखा माणूस. तुम्हाला माहिती असेल तर नंतर मला सांगा, असे म्हणत ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीकाच केली आहे.

Uddhav Thackeray News :
Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @जालना : शरद पवार ते प्रकाश आंबेडकर; राज्यातील दिग्गज नेत्यांची अंतरवालीत धाव...भाग-४

उद्धव ठाकरेंनी जालन्यातील आंदोलकांच्या घरी भेट दिली होती. यावरही त्यांनी भाष्य करत घडलेल्या प्रकाराकडे लक्ष वेधलं आहे. "मी एका आंदोलकाच्या घरी भेट दिली. त्या माऊलीलाही लाठीमारात खूप दुखापत झाली होती. आंदोलक शांततेत आंदोलन करत असताना पोलिस घुसले आणि अतिरेकी असल्यासारखा आमच्यावर लाठीमार सुरू केल्याचं त्या बहिणीने सांगितलं. तिच्या मुलाला आणि सुनेलाही इतकं मारलं गेलं की, त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

मी दवाखान्यात त्या बहिणीच्या मुलाला आणि सुनेला दोघांना भेटलो, तर अक्षरश: माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. त्या मुलीला लाठीचा घाव इतका जोरात बसला होता की, ती जगली कशी असा प्रश्न मलाच पडला. एकाच्या डोक्यात, दुसऱ्याच्या डोळ्यांखाली छर्रा घुसला होता. ही राक्षसी वृत्ती आलीच कशी महाराष्ट्रात, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in