मुंबई : राज्यात ३० जून रोजी सत्तांतर झाले. शिवसेनेत फूट पडून अनेक आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली. एकनाथ शिंदे आणि उद्धव सेनेमध्ये निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. हे प्रकरणा आता न्यायालयात गेले आहे.
खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाने केला आहे. शिंदे आणि ठाकरे गटातील या वादावर आज (गुरुवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सुनावणी होते आहे. न्यायालयाने याबाबत आठ प्रश्न तयार केले आहे. त्यावरुन खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे.
मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी 8 प्रश्न तयार केले होते, ज्याच्या आधारे घटनापीठ शिवसेना कोणाची आहे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हाच्या वादावर आजपर्यंत (गुरुवार) निर्णय न घेण्यास सांगितले होते.
एकनाथ शिंदे यांनी 23 जून रोजी दावा केला होता की, त्यांना शिवसेनेच्या 35 आमदारांचा पाठिंबा आहे. तसे पत्रही त्यांनी दिले आहे. 23 ऑगस्ट रोजी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला.
"आमच्यावर चुकीच्या पद्धतीने अपात्रतेचा आरोप लावण्यात आले आहेत. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात, वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना सांगितले होते की, शिंदे गटात जाणारे आमदार जर त्यांनी वेगळा झालेला त्यांचा गट दुसऱ्या पक्षात विलीन केला तरच ते घटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार अपात्रता टाळू शकतात. त्यांना वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही," असेही शिंदे यांनी मागील सुनावणीत म्हटलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.